शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विठ्ठलाच्या ओढीने दिंड्या पंढरपूरला रवाना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:48 IST

हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले.

ठळक मुद्देविठ्ठलाच्या ओढीने दिंड्या पंढरपूरला रवाना...दोन टप्प्यात दिवसभरात २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास

कोल्हापूर : हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले.महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल म्हणजे भाविकांची माऊली. कष्टकरी, बहुजनांच्या या देवाची आषाढी एकादशी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सोहळा. यंदा १२ तारखेला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या पालख्यांनी आठ दिवसांपूर्वीच प्रस्थान ठेवले आहे.

आता एकादशीला दहा दिवस राहिल्याने कोल्हापुर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून गावागावातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होत आहेत. जिल्ह्यासह कोल्हापुर शहरातील विश्वपंढरी तसेच विविध मंडप, मंडळांच्यावतीने या दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात दिवसभरात २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास केला जातो. या दहा दिवसात दिंडी सहा ठिकाणी मुक्कामाला थांबते. 

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर