शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:19 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या

ठळक मुद्देपोर्टलवरील याद्या गायब :कर्जमाफी लोंबकळण्याची शक्यताबॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या आणि त्यानंतर पोर्टलवरून त्या गायब झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. तालुकास्तरीय समितीचे काम ठप्पच राहिल्याने कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या हातात नेमकी कधी पडेल याबाबत संभ्रमावस्था पसरली असून कर्जमाफीचे प्रकरण लोंबकळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदारांना दीड लाखांपर्यंत तर नियमित परतफेड करणाºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने लेखापरीक्षण करून अपलोड केलेल्या याद्यांतील पात्र, अपात्र लाभार्थ्यांची नावे पोर्टलवर जाहीर केली. वास्तविक आयटी विभागाने आयकर परतावा करणारे व सरकार कर्मचाºयांची नावे वगळून पात्र, अपात्र शेतकºयांची नावे जाहीर करायची आहे.

या यादीतून सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांची नावे वगळण्याचे काम तालुकास्तरीय समिती करणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती केवळ निरीक्षणाचे काम करून विभागीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.राज्य सरकारच्या आयटी विभागाने १८ आॅक्टोबरला शेतकºयांची अर्धवट नावे प्रसिद्ध केली आणि पुन्हा गोंधळ उडाला. मंगळवारपासून तर ही यादीही पोर्टलवरून गायब झाल्याने सहकार विभागाला काहीच काम करता येईना. पोर्टलवर यादी नसल्याने तालुकास्तरीय समितीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लोंबकळत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मंजुरी आधीच जमा-खर्चाने गोंधळ!सहकार विभागाने जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सोमवारी जमा-खर्च करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले होते; पण कर्जमाफीच्या निकषांनुसार तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिल्याशिवाय ती रक्कम ग्राह्य मानता येत नाही. बॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी सकाळी तातडीने सहकार विभागाने या समितीची मान्यता घेतली.आजपासून चावडी वाचनग्रामपंचायत आचारसंहितेमुळे थांबलेला चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वास्तविक सोमवारपासून वाचन सुरू होईल, असे सांगण्यात आले पण गेली दोन दिवस संबंधितांना प्रशिक्षणच देण्यात आले. त्यामुळे आज, बुधवारपासून चावडी वाचनास सुरुवात होणार आहे.