शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:19 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या

ठळक मुद्देपोर्टलवरील याद्या गायब :कर्जमाफी लोंबकळण्याची शक्यताबॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या आणि त्यानंतर पोर्टलवरून त्या गायब झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. तालुकास्तरीय समितीचे काम ठप्पच राहिल्याने कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या हातात नेमकी कधी पडेल याबाबत संभ्रमावस्था पसरली असून कर्जमाफीचे प्रकरण लोंबकळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदारांना दीड लाखांपर्यंत तर नियमित परतफेड करणाºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने लेखापरीक्षण करून अपलोड केलेल्या याद्यांतील पात्र, अपात्र लाभार्थ्यांची नावे पोर्टलवर जाहीर केली. वास्तविक आयटी विभागाने आयकर परतावा करणारे व सरकार कर्मचाºयांची नावे वगळून पात्र, अपात्र शेतकºयांची नावे जाहीर करायची आहे.

या यादीतून सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांची नावे वगळण्याचे काम तालुकास्तरीय समिती करणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती केवळ निरीक्षणाचे काम करून विभागीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.राज्य सरकारच्या आयटी विभागाने १८ आॅक्टोबरला शेतकºयांची अर्धवट नावे प्रसिद्ध केली आणि पुन्हा गोंधळ उडाला. मंगळवारपासून तर ही यादीही पोर्टलवरून गायब झाल्याने सहकार विभागाला काहीच काम करता येईना. पोर्टलवर यादी नसल्याने तालुकास्तरीय समितीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लोंबकळत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मंजुरी आधीच जमा-खर्चाने गोंधळ!सहकार विभागाने जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सोमवारी जमा-खर्च करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले होते; पण कर्जमाफीच्या निकषांनुसार तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिल्याशिवाय ती रक्कम ग्राह्य मानता येत नाही. बॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी सकाळी तातडीने सहकार विभागाने या समितीची मान्यता घेतली.आजपासून चावडी वाचनग्रामपंचायत आचारसंहितेमुळे थांबलेला चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वास्तविक सोमवारपासून वाचन सुरू होईल, असे सांगण्यात आले पण गेली दोन दिवस संबंधितांना प्रशिक्षणच देण्यात आले. त्यामुळे आज, बुधवारपासून चावडी वाचनास सुरुवात होणार आहे.