शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कर्जमाफीत ‘आयटी’ विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:19 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या

ठळक मुद्देपोर्टलवरील याद्या गायब :कर्जमाफी लोंबकळण्याची शक्यताबॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर

कोल्हापूर : राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफीची जबाबदारी टाकलेल्या ‘आयटी’ विभागच पुरता गोंधळून गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या विभागाने अर्धवट याद्या पाठविल्या आणि त्यानंतर पोर्टलवरून त्या गायब झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. तालुकास्तरीय समितीचे काम ठप्पच राहिल्याने कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या हातात नेमकी कधी पडेल याबाबत संभ्रमावस्था पसरली असून कर्जमाफीचे प्रकरण लोंबकळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदारांना दीड लाखांपर्यंत तर नियमित परतफेड करणाºयांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांना लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहकार विभागाने लेखापरीक्षण करून अपलोड केलेल्या याद्यांतील पात्र, अपात्र लाभार्थ्यांची नावे पोर्टलवर जाहीर केली. वास्तविक आयटी विभागाने आयकर परतावा करणारे व सरकार कर्मचाºयांची नावे वगळून पात्र, अपात्र शेतकºयांची नावे जाहीर करायची आहे.

या यादीतून सहकारी संस्थांच्या पदाधिकाºयांची नावे वगळण्याचे काम तालुकास्तरीय समिती करणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समिती केवळ निरीक्षणाचे काम करून विभागीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविली जाणार आहे.राज्य सरकारच्या आयटी विभागाने १८ आॅक्टोबरला शेतकºयांची अर्धवट नावे प्रसिद्ध केली आणि पुन्हा गोंधळ उडाला. मंगळवारपासून तर ही यादीही पोर्टलवरून गायब झाल्याने सहकार विभागाला काहीच काम करता येईना. पोर्टलवर यादी नसल्याने तालुकास्तरीय समितीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लोंबकळत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मंजुरी आधीच जमा-खर्चाने गोंधळ!सहकार विभागाने जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा सोमवारी जमा-खर्च करण्याचे आदेश जिल्हा बँकेला दिले होते; पण कर्जमाफीच्या निकषांनुसार तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिल्याशिवाय ती रक्कम ग्राह्य मानता येत नाही. बॅँकेने सोमवारी जमा-खर्चाचे आदेश दिले पण चूक लक्षात आल्यानंतर मंगळवारी सकाळी तातडीने सहकार विभागाने या समितीची मान्यता घेतली.आजपासून चावडी वाचनग्रामपंचायत आचारसंहितेमुळे थांबलेला चावडी वाचनाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. वास्तविक सोमवारपासून वाचन सुरू होईल, असे सांगण्यात आले पण गेली दोन दिवस संबंधितांना प्रशिक्षणच देण्यात आले. त्यामुळे आज, बुधवारपासून चावडी वाचनास सुरुवात होणार आहे.