शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बिनविरोध झालेल्या ठिकाणी दुसऱ्यांदा होण्यात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा ...

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा चुराडा होतो. यातून पुढील काळात गावातील वातावरण बिघडलेले असते. विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी अनेक गावांत बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी यात यशही येते. मात्र, अनेक गावांतील ग्रामस्थाना नंतर वेगळा अनुभव येतो. एकदा बिनविरोध सत्ता मिळाली की लोकांना दुर्लक्षित केले जाते. ज्या उद्देशाने बिनविरोध निवडीचा खटाटोप केला जातो, तो उद्देशच बाजूला पडतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवड झालेल्या गावात सहसा दुसर्‍यांदा हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, असे सर्वसाधारण चित्र आहे.

स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीवर सत्ता असल्यास असणारी प्रतिष्ठा, विकासकामे करण्याची व सत्तेची फळे चाखण्याची मिळणारी संधी अशा कारणामुळे ही सत्ता मिळविण्यासाठी मोठी धडपड होते. मात्र, सजग झालेली सध्याची पिढी, अनेकांची वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यामुळे वाढलेली स्पर्धा यामुळे ही बाब पूर्वीएवढी सहजसोपी राहिलेली नाही. ईर्ष्येने होणार्‍या निवडणुका पुढील काळात विकासात अडचणीच्या होतात. अनेक कामांना राजकीय दृष्टिकोनातून विरोध वा समर्थन दिले जाते. तरीही निवडणुकीचा दबाव असल्याने व विरोधकांचे लक्ष राहत असल्याने जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अपवाद वगळता अनेक ठिकाणी अनेक समस्या सोडविण्याचा व चांगली विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो.

याउलट चित्र बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात असते. निवडणुकीनंतर लोकांचे फारसे लक्ष नसते. सर्वसमावेशक सदस्य असल्याने कोणीच कोणाविरोधात बोलत नाही. त्याचा परिणाम बेलगाम कारभार होण्यात होतो, असा सार्वत्रिक अनुभव येतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात पुन्हा याबाबत फारसे स्वारस्य नसल्याचे चित्र दिसते. एकतर्फी सत्ता असणार्‍या ठिकाणीही अशी स्थिती असते.

२०१५ मध्ये राधानगरी तालुक्यात २० गावांत निवडणुका झाल्या. त्यापैकी हेळेवाडी, बुरंबाळी, चाफोडी तर्फ असंडोली, सावर्दे-वडाचीवाडी, राजापूर, कंथेवाडी, आणाजे या सात ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. बरगेवाडी येथेही बिनविरोध निवड झाली; मात्र सात पैकी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक स्थगित झाली होती. यापैकी आता बुरंबाळी, चाफोडी, सावर्दे यासह अन्य काही गावांत बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू आहेत.