शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध झालेल्या ठिकाणी दुसऱ्यांदा होण्यात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा ...

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा चुराडा होतो. यातून पुढील काळात गावातील वातावरण बिघडलेले असते. विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी अनेक गावांत बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी यात यशही येते. मात्र, अनेक गावांतील ग्रामस्थाना नंतर वेगळा अनुभव येतो. एकदा बिनविरोध सत्ता मिळाली की लोकांना दुर्लक्षित केले जाते. ज्या उद्देशाने बिनविरोध निवडीचा खटाटोप केला जातो, तो उद्देशच बाजूला पडतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवड झालेल्या गावात सहसा दुसर्‍यांदा हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, असे सर्वसाधारण चित्र आहे.

स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीवर सत्ता असल्यास असणारी प्रतिष्ठा, विकासकामे करण्याची व सत्तेची फळे चाखण्याची मिळणारी संधी अशा कारणामुळे ही सत्ता मिळविण्यासाठी मोठी धडपड होते. मात्र, सजग झालेली सध्याची पिढी, अनेकांची वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यामुळे वाढलेली स्पर्धा यामुळे ही बाब पूर्वीएवढी सहजसोपी राहिलेली नाही. ईर्ष्येने होणार्‍या निवडणुका पुढील काळात विकासात अडचणीच्या होतात. अनेक कामांना राजकीय दृष्टिकोनातून विरोध वा समर्थन दिले जाते. तरीही निवडणुकीचा दबाव असल्याने व विरोधकांचे लक्ष राहत असल्याने जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अपवाद वगळता अनेक ठिकाणी अनेक समस्या सोडविण्याचा व चांगली विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो.

याउलट चित्र बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात असते. निवडणुकीनंतर लोकांचे फारसे लक्ष नसते. सर्वसमावेशक सदस्य असल्याने कोणीच कोणाविरोधात बोलत नाही. त्याचा परिणाम बेलगाम कारभार होण्यात होतो, असा सार्वत्रिक अनुभव येतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात पुन्हा याबाबत फारसे स्वारस्य नसल्याचे चित्र दिसते. एकतर्फी सत्ता असणार्‍या ठिकाणीही अशी स्थिती असते.

२०१५ मध्ये राधानगरी तालुक्यात २० गावांत निवडणुका झाल्या. त्यापैकी हेळेवाडी, बुरंबाळी, चाफोडी तर्फ असंडोली, सावर्दे-वडाचीवाडी, राजापूर, कंथेवाडी, आणाजे या सात ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. बरगेवाडी येथेही बिनविरोध निवड झाली; मात्र सात पैकी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक स्थगित झाली होती. यापैकी आता बुरंबाळी, चाफोडी, सावर्दे यासह अन्य काही गावांत बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू आहेत.