शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

बिनविरोध झालेल्या ठिकाणी दुसऱ्यांदा होण्यात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा ...

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा चुराडा होतो. यातून पुढील काळात गावातील वातावरण बिघडलेले असते. विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी अनेक गावांत बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी यात यशही येते. मात्र, अनेक गावांतील ग्रामस्थाना नंतर वेगळा अनुभव येतो. एकदा बिनविरोध सत्ता मिळाली की लोकांना दुर्लक्षित केले जाते. ज्या उद्देशाने बिनविरोध निवडीचा खटाटोप केला जातो, तो उद्देशच बाजूला पडतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवड झालेल्या गावात सहसा दुसर्‍यांदा हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, असे सर्वसाधारण चित्र आहे.

स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीवर सत्ता असल्यास असणारी प्रतिष्ठा, विकासकामे करण्याची व सत्तेची फळे चाखण्याची मिळणारी संधी अशा कारणामुळे ही सत्ता मिळविण्यासाठी मोठी धडपड होते. मात्र, सजग झालेली सध्याची पिढी, अनेकांची वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यामुळे वाढलेली स्पर्धा यामुळे ही बाब पूर्वीएवढी सहजसोपी राहिलेली नाही. ईर्ष्येने होणार्‍या निवडणुका पुढील काळात विकासात अडचणीच्या होतात. अनेक कामांना राजकीय दृष्टिकोनातून विरोध वा समर्थन दिले जाते. तरीही निवडणुकीचा दबाव असल्याने व विरोधकांचे लक्ष राहत असल्याने जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अपवाद वगळता अनेक ठिकाणी अनेक समस्या सोडविण्याचा व चांगली विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो.

याउलट चित्र बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात असते. निवडणुकीनंतर लोकांचे फारसे लक्ष नसते. सर्वसमावेशक सदस्य असल्याने कोणीच कोणाविरोधात बोलत नाही. त्याचा परिणाम बेलगाम कारभार होण्यात होतो, असा सार्वत्रिक अनुभव येतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात पुन्हा याबाबत फारसे स्वारस्य नसल्याचे चित्र दिसते. एकतर्फी सत्ता असणार्‍या ठिकाणीही अशी स्थिती असते.

२०१५ मध्ये राधानगरी तालुक्यात २० गावांत निवडणुका झाल्या. त्यापैकी हेळेवाडी, बुरंबाळी, चाफोडी तर्फ असंडोली, सावर्दे-वडाचीवाडी, राजापूर, कंथेवाडी, आणाजे या सात ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. बरगेवाडी येथेही बिनविरोध निवड झाली; मात्र सात पैकी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक स्थगित झाली होती. यापैकी आता बुरंबाळी, चाफोडी, सावर्दे यासह अन्य काही गावांत बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू आहेत.