शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक मतदारसंघात वेगळी आघाडी

By admin | Updated: January 21, 2017 00:06 IST

जिल्हा परिषदेचे रणांगण : पक्षीय निष्ठा, विचारधारा फाट्यावर

विश्वास पाटील -- कोल्हापूर --जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्व जागा लढविण्याची ताकद एकाही राजकीय पक्षात नाही. त्यामुळे सोयीनुसार युती व स्थानिक आघाड्यांचे पेव फुटणार आहेच परंतु या निवडणुकीत तालुक्यापुरत्या सोडाच प्रत्येक मतदारसंघापुरती एक आघाडी होईल असे चित्र दिसत आहे. त्यामुळे पक्षीय निष्ठा, विचारधारा अशा गोष्टींना फाट्यावर मारले जाणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत काँग्रेसच्या विचारधारेला जनतेने कायमच पाठबळ दिले. हा जिल्हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला असला तरी जिल्हा परिषद मात्र कायमच काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. मावळत्या सभागृहातही काँग्रेसचे चिन्हांवर ३० सदस्य निवडून आले होते; परंतु आता राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे हे या पक्षाचे प्रमुख नेते; परंतु त्यांच्यात परस्परांत कमालीच्या अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळे हा पक्ष एकसंधपणे निवडणुकीस सामोरे जाण्यातच अडचण आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपला या निवडणुकीत बऱ्याच अपेक्षा आहेत; परंतु त्यांची ग्रामीण भागात फारशी ताकद नाही. तीच स्थिती शिवसेनेची आहे. शिवसेनेचे सहा आमदार असले तरी जिल्हा परिषदेतही या पक्षाचे सहाच सदस्य आहेत. आक्रमक पक्ष म्हणून आतापर्यंत राष्ट्रवादीची प्रतिमा होती परंतु तिथेही नेत्यांमध्ये अंतर्गत प्रचंड धुसफूस आहे. ‘मुश्रीफ यांचा एकखांबी तंबू’ असेच या पक्षाला स्वरूप आले आहे. जनसुराज्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची काही तालुक्यांपुरतीच मर्यादित ताकद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व ६७ जागा व पंचायत समितीच्या १३४ जागा चिन्हांवर लढवू शकतील, अशी एकाही पक्षाची हिंमत नाही. आता जे आकडे पक्षांकडून जाहीर केले जात आहेत, तेवढ्या जागा लढविण्यासाठीही पक्षांकडे उमेदवार नाहीत. ‘कोण उमेदवार मिळेल का उमेदवार’ असे म्हणण्याची वेळ अनेक मतदारसंघांत आहे. त्यावर तोडगा म्हणून मग स्थानिक आघाड्यांचे पेव फुटले आहे.आतापर्यंत चित्र असे होते की काही तालुक्यांपुरत्याच अशा आघाड्या केल्या जात होत्या; परंतु आता प्रत्येक मतदारसंघांत उघड किंवा छुपी आघाडी आकार घेऊ लागली आहे. पंचायत समितीला एका पक्षाबरोबर तर जिल्हा परिषदेला दुसऱ्याच पक्षाशी संधान बांधले जात आहे. काँग्रेसने त्यांचा राजकीय विरोधक असलेल्या भाजपशी कशी युती करायची, असा प्रश्नही कुणाला पडणार नाही कारण काही मतदारसंघांत पंचायत समितीचा उमेदवार व जिल्हा परिषदेचा उमेदवारांत असे साटेलोटे होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर करवीर दक्षिण, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांत भाजपशी थेटच आघाडी करणार आहे. ‘शिवसेना म्हणजे जातीयवादी पक्ष’ म्हणणारे दोन्ही काँग्रेसवाले भाजपचा काटा काढण्यासाठी शिवसेनेची मदत घेणार आहेतच शिवाय पुन्हा सत्ता आणण्यासाठी जागा कमी पडल्या तर त्यांना सोबतीला घेतले जाणार आहे. महापालिकेच्या सत्तेत जसे सेनेला भाजपपासून अलगद बाजूला केले गेले तशी खेळी येथेही होणार आहे.सर्वच पक्षांची ही स्थिती असल्याने सत्ता कुणाची येणार याबद्दलही कमालीचा संभ्रम आहे. काँग्रेसने पाच वर्षांत सत्ता असूनही काही दिवे लावले नसले तरी त्यांना बाजूला करून कुणाकडे या ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या संस्थेच्या चाव्या द्यायच्या, याचेही उत्तर मतदारांकडे नाही. ‘भाजता’पुढेही अडचणीच अधिक भाजप-जनसुराज्यसह ताराराणी आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मोट बांधणार आहे. हे सगळे गणित जमविण्याची जबाबदारी अर्थातच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतली आहे. त्यांचा स्वभाव आता जो प्रॉब्लेम आहे, त्याचे उत्तर शोधायचे. ‘पुढचे पुढे बघू,’असा आहे. प्रश्न सुटणार असेल आणि कुणाला चंद्र आणून देतो म्हणून सांगायचे असेल तर त्यातही ते मागे राहत नाहीत; परंतु ही सगळी मोटच आंतरिक विरोधाने ग्रासलेली आहे. कारण कोरे व शेट्टी यांचे जमत नाही. आता त्यात भाजप व शेट्टी यांचेही जमेना झाले आहे. त्यामुळेच शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचे हाकारे द्यायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला कोरे व महाडिक यांचाही छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे या एका म्यानात तीन धारदार तलवारी बाळगताना पालकमंत्री दादांचीच कसरत होणार आहे.