शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

रेशन कार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे केंद्र सरकारतर्फे मे आणि जून महिन्यात अंत्योदय, प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मोफत धान्य दिले जाते. मात्र अजूनही ...

कोल्हापूर : कोरोनामुळे केंद्र सरकारतर्फे मे आणि जून महिन्यात अंत्योदय, प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मोफत धान्य दिले जाते. मात्र अजूनही या गटात नसलेले पण गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना हे धान्य मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. पण नव्याने या यादीत नावांचा समावेश करण्याची प्रक्रिया तालुका पातळीवरच रखडली आहे. यामुळे पात्र असूनही यादीत नाव नसल्याने मोफत धान्य वाटप करता येत नाही, असे जिल्हा पुरवठा प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून अंत्योदय, प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना मे, जून महिन्यात मोफत धान्य दिले जात आहे. पण अलिकडे पात्र असलेल्या कुटुंबांची या गटात समावेश करण्याची व्यापक मोहीम महसूल प्रशासनाने राबवलेली नाही. यामुळे गावागावातील अनेक पात्र कुटुंब मोफत धान्यापासून वंचित राहिले आहेत. परिणामी संबंधित कुटुंबांची जगताना ओढाताण होत आहे.

१) पाॅईंटर्स

एकूण रेशनकार्डधारक -

बीपीएल - १४५९६५

अंत्योदय - ५३११६

केशरी - ३१८३५५

२) तिघांच्या प्रतिक्रिया.

हाताला काम नाही आणि रेशनवर मोफत धान्यही नाही, अशी परिस्थिती अनेक कुटुंबांची आहे. संबंधित कुटुंबाची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यांचे जगणेही अडचणीचे झाले आहे. यामुळे सर्व गरिबांना सरकारने मोफत धान्य द्यावे.

दिलदार मुजावर, विक्रमनगर

अंत्योदय, प्राधान्य गटाच्या यादीत नाव नसल्याने अनेक गरीब कुटुंबांना धान्य मिळत नाही. प्रशासनाने रेशनकार्ड असलेल्या सर्वांना मोफत धान्य द्यावे. प्रतिमाणसी आता मिळणारे धान्य तुटपुंजे आहे. त्यात वाढ करून मिळावे.

अनिल मोरे, शिंगणापूर

रेशनकार्डावर गहू, तांदळासोबत इतर जीवनावश्यक साहित्याचे मोफत वाटप करावे. कोरोनामुळे गरिबी वाढली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मदत करावी. यादीत नाव नाही, म्हणून धान्य देणे बंद करू नये. गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांनाही मोफत धान्य मिळावे.

विद्या मांगुरे, मंगळवारपेठ

३) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा कोट

सरकारच्या आदेशानुसार मे-जून महिन्यात पात्र रेशनकार्डधारकांंना मोफत तांदूळ, गहू दिले जात आहे. नियमाप्रमाणे धान्य न मिळाल्यास किंवा मोफत असूनही पैसे घेणाऱ्या दुकानदारांविरोधात तहसीलदार, जिल्हा पुरवठा प्रशासनाकडे तक्रार करावी. तक्रारीची दखल घेत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी

४) धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा

काही ठिकाणी धान्य न घेता अंगठा (थंब) घेण्याचे प्रकार घडत आहेत. पण लाभार्थी गरीब असल्याने त्यांना प्रशासनापर्यंत पोहचण्यात अडचणीत येतात. म्हणून लाभार्थींनी धान्य घेतल्यानंतरच अंगठा मशिनला लाववे, असे पुरवठा प्रशासनाचे म्हणणे आहे.