शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळची निवडणूक झाल्यावर कोरोना आठवला का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

कोल्हापूर : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला ...

कोल्हापूर : गेले महिनाभर कोरोनाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला असताना राजकारण्यांना ‘गोकुळ’ची निवडणूक महत्त्वाची होती, ती संपल्यावर यांना कोरोना आठवला का, जीवनावश्यक अशी ‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरात कडक बंद, पीपीई कीट घालून मतदान होत असेल तर नागरिकांना कीट घालून व्यवसाय करू द्या., कोल्हापुरातील राजकारण्यांचा जाहीर निषेध, अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर जहरी टीका करत कोल्हापूरकरांनी समाजमाध्यमांवर आपला संताप व्यक्त केला आहे.

गेले महिनाभर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. मात्र, त्या काळातही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन ‘गोकुळ’ची निवडणूक लढवली गेली. याकाळात तालुक्यांमध्ये प्रचार मेळावे घेतले गेले, त्यानिमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत होते, काही ठरावधारकांचा कोरोनाचे मृत्यूदेखील झाला. हे सगळं सुरू असतानााही ‘गोकुळ’ची निवडणूक पुढे ढकलली गेली नाही. उलट कोरोनाच्या सगळ्या निर्बंधांना पायदळी तुडवत ही निवडणूक पार पाडली गेली आणि मंगळवारी मतमोजणी सुरू झाली की राजकीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला. या प्रकारावर समाजमाध्यमांद्वारे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

कोरोनाचा प्रकोप सुरू असताना राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते गोकुळ निवडणुकीच्या राजकारणात मग्न होते. या लोकांनी स्वतःचे आर्थिक व राजकीय हित साधण्यासाठी कोल्हापूरच्या जनतेला वाऱ्यावर सोडले. रेमडेसिविर इंजेक्शन, कोरोना लस, ऑक्सिजन बेडची सोय याचा आढावा एकाही राजकारण्याने घेतला नाही. तुमच्या नादाला लागून कोणाचे हित झाले नाही म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून रोजीरोटी मिळविण्याचा प्रयत्न करत होतो, ते पण तुम्ही लॉकडाऊन करून मोडून पाडत आहात. आता आमच्यासमोर मरण आहेच फक्त कोरोनाने मरायचे, उपाशीपोटी मरायचे की हार्ट अटॅकने मरायचे एवढेच बाकी आहे. तुमची घराणेशाही, सत्तेची आणि पैशांची भूक भस्म्यारोगा सारखीच आहे. अशा शब्दांत राजकीय नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.

----

समाजमाध्यमावरील संदेश

-काल गोकुळात रंग खेळले हरी, नागरिका आता जपून रहा तुझ्या घरी, नाही तर जाशील देवाघरी

-गोकुळ लयच मोठं हाय की राव आयपीएल पण इलेक्शन झाल्यावर रद्द केली.

-पाऊस पण गोकुळच्या इलेक्शनसाठी थांबला होता की काय

-. गोकुळच लोणी खाण्यासाठी जेवढे घासला तेवढे लस मिळविण्यासाठी घासला असता तर कोल्हापूर जिल्हा लसीकरणात अव्वल ठरला असता..

--