शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

खरेदीदारांवर गुन्हे दाखल केले का?

By admin | Updated: March 16, 2017 00:26 IST

सदाभाऊ खोत : बाजार समितीला विचारणा; अडतप्रश्नी भाजी मार्केट बंद प्रकरण

कोल्हापूर : अडत देण्यावरून भाजीपाला मार्केट अचानक बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या खरेदीदारांवर गुन्हे दाखल केले की नाही? अशी विचारणा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बाजार समितीला केली. शेतकऱ्यांवर दादागिरी करून त्यांची वाहने कोणी फोडत असेल तर तुम्ही काय करत होता, अशा शब्दांत त्यांनी समिती पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. कॅशलेस व्यवहाराबाबत आयोजित डिजिधन मेळाव्यासाठी राज्यमंत्री खोत कोल्हापुरात आले होते, त्यावेळी त्यांनी बाजार समिती पदाधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृह येथे बोलावून घेऊन मागील आठवड्यात झालेल्या भाजी मार्केट बंदची माहिती घेतली. भाजी मार्केट बंद पाडणारे खरेदीदार किती होते? अशी विचारणा करत बंदमुळे शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, याची माहिती घेतली. बंद काळात खरेदीदारांनी शेतकऱ्यांच्या गाड्यांची हवा सोडणे, फोडाफोडी करणे, याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल केले का? अशी विचारणा खोत यांनी केली. यावर सभापती सर्जेराव पाटील म्हणाले, गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांवर पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. पोलिस बंदोबस्तात भाजी मार्केटमधील सौदे सुरू ठेवले. यावर कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनाही खोत यांनी केल्याचे समजते. त्यानंतर खोत यांनी बाजार समितीमधील कॅशलेस व्यवहाराची माहिती घेतली. गूळ मार्केटमध्ये ९० टक्के, कांदा-बटाटा मार्केटमध्ये ६० टक्के, तर भाजीपाला-फळे मार्केटमध्ये ४० टक्के व्यवहार कॅशलेस सुरू असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. यावेळी पणन व्यवस्थापक अनिल पोवार, शहर उपनिबंधक संभाजी निकम, करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे, मोहन सालपे, आदी उपस्थित होते.