शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षणप्रश्नी १० रोजी ‘ढोल गजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:39 IST

कोल्हापूर : धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता ...

कोल्हापूर : धनगर समाजाला लागू असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात सोमवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता ढोल गजर आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी येथे बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये आवाज न उठविणाºया आमदार-खासदारांना येत्या निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा मल्हार सेनेचे प्रमुख बबन रानगे यांनी यावेळी दिला.दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे मल्हार सेना, धनगर समाज महासंघ, धनगर समाज युवक संघटना यांच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.आरक्षणाच्या अंमलबजावणीप्रश्नी सरकारने समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत छगन नांगरे, सिद्धार्थ बन्ने, शहाजी सिद, राघू हजारे, प्रल्हाद देबाजे, डॉ. विजय गोरड, बाबूराव बोडके, मायाप्पा धनगर, आदींनी तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच सरकारविरोधात तीव्र आंदोलन जाहीर करावे असेही सांगितले. त्यावर बैठकीत सरकारला जाग आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने नावीन्यपूर्ण आंदोलन करून आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत ते सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभकर्णाची झोप घेतलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी दिवसभर ढोल आंदोलन करून जिल्हाधिकाºयांच्या कामात व्यत्यय आणला जाईल. या ठिकाणी पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल.रानगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ज्याप्रमाणे सर्व आमदारांनी एकत्र येऊन अधिवेशनामध्ये पाठिंबा दिला, त्याप्रमाणे धनगर आरक्षण प्रश्नावर एकाही आमदाराने आवाज उठविला नाही. प्रत्येक मतदार संघात धनगर समाजाची निर्णायक मते असून, येणाºया निवडणुकीमध्ये या आमदारांना धडा शिकविला जाईल.बयाजी शेळके म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू असूनही सरकारकडून त्याच्या अंमलबजावणीला विलंब का केला जातो, हे कळत नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलनाशिवाय सरकारला जाग येणार नाही.मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केलीसत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत निकाली काढू, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे उलटली तरी अद्याप काहीच हालचाल न करता त्यांनी समाजाची फसवणूक केल्याचा आरोप रानगे यांनी केला.