शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

धामणी नदीचे पात्र कोरडे

By admin | Updated: April 24, 2017 00:00 IST

तीव्र पाणीटंचाई : धामणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर

महेश आठल्ये ल्ल म्हासुर्लीमातीच्या बंधाऱ्यात अडविलेले पाणी संपल्याने धामणी नदीचे पात्र कोरडे पडले असून, धामणी खोऱ्यातील २० ते २५ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नदीत जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांत जणू स्पर्धा लागली असून, या पाण्यावरून मोठ्या वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. खोऱ्यातील तीव्र पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिके करपत असून, शेतकरी वळवाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे धामणी प्रकल्पाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रकल्पाचे काम या महिन्यात सुरू करण्याचे मुंबई येथील बैठकीत गत महिन्यात दिलेले आश्वासन निव्वळ आश्वासनच राहणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.धामणी खोऱ्यात पावसाळ्यात मुबलक पाऊस पडतो. मात्र, साठवण प्रकल्प नसल्याने सर्व पाणी वाहून जाते. परिणामी, धामणी खोऱ्यात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवते. यासाठी शेतकरी स्वखर्चाने व श्रमदानाने धामणी नदीवर मातीचे बंधारे घालून पाणी अडवून ते काटेकोर नियोजनाने पुरवून वापरतो व आपली पिके वाढवतो. मात्र, हे पाणी मार्च-एप्रिलमध्येच संपून जाते. या खोऱ्यास सुमारे तीन महिने तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या राही-कंदलगावपासून पणोरेवर सुमारे ४० च्या आसपास वाड्या-वस्त्या सध्या नदीपात्रातील मातीच्या बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पाणीटंचाईच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. सर्वच बंधारे कोरडे पडले असून, नदीपात्रात वाळवंट तयार झाल्याचे भासते. सध्या पाणी मिळविण्यासाठी शेतकरी नदीपात्रात जेसीबीद्वारे खड्डे खोदून पाणी मिळविण्यासाठी धडपडत असून, त्यातही त्यांना अपयश येत आहे. सध्या या परिसरात शेतीसह जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. येत्या आठवड्याभरात नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार असून, खोऱ्यातील बळिराजा हवालदिल झाला आहे.या खोऱ्यास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे काम अद्यापहीसुरू न झाल्याने, तसेच झापावाडी व पणोरे येथील लघुपाटबंधारे प्रकल्पांची कामेही संथगतीने सुरू असल्याने येत्या दोन वर्षांतही या खोऱ्यातील पाणीटंचाई कमी होण्याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. सध्या खोऱ्यातील पिके वाळू लागली असून, शेतकऱ्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागणार असल्याने तो हवालदिल झाला आहे.