शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

देवस्थान जमिनीवर मालकी हक्क द्या

By admin | Updated: March 28, 2016 00:44 IST

संतराम पाटील : शेतकरी मेळाव्यात ठराव

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे कसत असलेल्या देवस्थानच्या जमिनीवर संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क द्या, संघटनेशी चर्चा केल्याशिवाय समितीच्या शिफारशी लागू करू नयेत, असे ठराव महाराष्ट्र राज्य देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आले. इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतराम पाटील होते. देवस्थान जमिनीच्या मालकी हक्कांसाठी गेली पंधरा वर्षे संघर्ष सुरू असून, त्याला आता कुठेतरी यश येत असल्याचे सांगत संतराम पाटील म्हणाले, यश येते म्हटल्यावर अनेक मंडळी श्रेयासाठी पुढे येत आहेत. आम्हाला कोणत्याही गोेष्टीचे श्रेय घ्यायचे नाही; पण या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, या हेतूने १९९९ सालापासून काम करत आहोत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी देवस्थान जमिनीबाबत विचारविनिमय करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे; पण या समितीवर संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, जेणेकरून या शेतकऱ्यांची दुखणी त्यांना समजतील. सरकारची पावले चांगल्या दिशेने पडत असल्याने इनामी जमिनीबाबत सरकार निश्चितच चांगला निर्णय घेईल. चौकशी समितीच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करावी अन्यथा सरकारलाही ताकद दाखवावी लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभारावर सडकून टीका करताना संघटनेचे सचिव प्रा. वसंत चांदूरकर म्हणाले, जमिनी कसून सरकारला आम्ही खंड कशासाठी भरायचा? पाच जिल्ह्यांतील शेतकरी शेकडो किलोमीटरवरून खंड जमा करण्यासाठी येतात; पण देवस्थान समितीत लिपिकच नाही; त्यामुळे अनेक वेळा खंड भरता येत नाही; पण त्यासाठी दंड आकारला जातो., हे अन्यायी असल्याचे सांगत इतर अधिकारातून मालकी हक्काच्या जमिनी व्हाव्यात एवढीच मागणी असल्याचे प्रा. चांदूरकर यांनी सांगितले. अनंत चौगुले, राजेंद्र माने, मदन मस्के, आदींनी मनोगत व्यक्त केले. तुळसाराम पाटील, निवृत्ती बच्चे, बाबूराव कदम, रघुनाथ भोसले, किरण पाटील, सुनीता कोरे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.