शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

‘देवदास’च्या कहाणीतून चर्चेत आला ‘देवमाणूस’--मनोरुग्णांचा वाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:28 IST

जहॉँगीर शेख।कागल : गेली सतरा ते अठरा वर्षे कागल शहराचा एक घटक झालेला ‘देवदास’ हा मनोरुग्ण योग्य उपचारांमुळे नॉर्मल बनून आपल्या पश्चिम बंगालमधील गावी परत गेला. याबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कागलकरांची ‘देवदास’च्या प्रति असणारी हुरहूर ठळक झाली. मात्र, देवदासच्या या कहाणीतून अधिकच प्रकाशात आला मनोरुग्णांच्यासाठीचा देवमाणूस.पेरणोली (ता. आजरा) येथील ...

ठळक मुद्देनोकरी, घरदार, त्यागून पूर्णवेळ समाजसेवेचे व्रत; समाजाने दातृत्व दाखविण्याची गरज!

जहॉँगीर शेख।कागल : गेली सतरा ते अठरा वर्षे कागल शहराचा एक घटक झालेला ‘देवदास’ हा मनोरुग्ण योग्य उपचारांमुळे नॉर्मल बनून आपल्या पश्चिम बंगालमधील गावी परत गेला. याबद्दलचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर कागलकरांची ‘देवदास’च्या प्रति असणारी हुरहूर ठळक झाली. मात्र, देवदासच्या या कहाणीतून अधिकच प्रकाशात आला मनोरुग्णांच्यासाठीचा देवमाणूस.पेरणोली (ता. आजरा) येथील अमित प्रभा वसंत देवदासच्या वृत्तामुळे ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच; पण त्यापेक्षा अधिक शुभेच्छा बरसल्या त्या ‘माणुसकी’ फौंडेशनवर, अमित वसंतवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर. ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ असे म्हणतात.

त्याचप्रमाणे जगी मनोरुग्णांना कोणी नाही त्यास अमित आणि त्याचे सहकारी आहेत, असेच एकूण कार्यही ध्येयासक्त युवक करीत आहेत. अमित हा तर जिथे माणुसकीची गरज आहे तेथे हजर होणे, हे ब्रीद घेऊन गेली आठ वर्षे जगत आहे. त्याने नोकरी, घरदार, प्रपंच त्यागून पूर्णवेळ समाजसेवा हे व्रत घेतले आहे. सुरुवातीला डोंगरदºयातील धनगरवाडे आणि तेथील लोकांची सेवा, असे कार्य सुरू झाले. मात्र, एका जखमी मनोरुग्णावर उपचाासाठी कोणतेही खासगी रुग्णालय तयार होत नव्हते. या घटनेने हा उच्चशिक्षित युवक अस्वस्थ बनला आणि मग सुरू झाली ही मनोरुग्णांना ‘मनोयात्री’ मानून त्यांची सेवा करण्याची कहाणी. मनोरुग्णांना आपल्या घरी नेऊन त्यांना स्वच्छ करून दवाखान्यात नेण्यापासून त्याचे केशकर्तन, प्राथमिक उपचारही ते करतात. कागलच्या ‘देवदास’च्या कहाणीने या देवमाणसाची कहाणीही चर्चेत आली आहे.रुग्णावाहिकेची गरजकर्जत येथील डॉ. भरत वाटवाणी हे मानसोपचारतज्ज्ञ, माणुसकी फौंडेशनकडून आलेल्या मनोरुग्णांवर कर्जतपर्यंत नेणे, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणे यासाठी दरवेळी रुग्णवाहिका शोधावी लागते. कर्जतपर्यंतचे भाडे देण्यासाठी पैशांचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यातही जखमी, विक्षिप्त, संतप्त मनोरुग्णांना नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकाही नकार देतात. म्हणून आज माणुसकी फौंडेशनला एका रुग्णवाहिकेची गरज आहे. समाजाने अमित प्रभा वसंत यांच्या या नि:स्वार्थी कार्याला दातृत्व दाखवित मदत करण्याची गरज आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. दानशूर लोकांनीही मदत करावी, असे आवाहन या फौंडेशनचे वीरेंद्र मोरबाळे यांनी केले आहे.तीन वर्षांत १७० मनोरुग्णांवर उपचारअमित प्रभा वसंत यांनी हे कार्य सुरू केल्यापासून तीन वर्षांत १७० मनोरुग्णांवर उपचार केले आहेत. त्यापैकी ६७ मनोरुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. नेपाळ, बिहार, कर्नाटक, राजस्थान अशा विविध ठिकाणांच्या या मनोरुग्णांच्या कहाण्या हृदयस्पर्शी आहेत. त्याचबरोबर सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर येथून त्यांना या कामासाठी नि:स्पृह कार्यकर्तेही लाभले आहेत. फेसबुक पेजवर ही सर्व माहिती उपलब्ध आहे.