शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

देवेंद्र दरबारी आता पालिका पदाधिकारी, सदस्यांची बारी...

By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST

एलबीटीचा प्रश्न : २८२ कोटींच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव

सांगली : एलबीटीप्रश्नी व्यापारी संघटनांशी तीन ते चार वेळा चर्चा करून झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनीमहापालिकेची छळकथा ऐकविल्यानंतर आता महापालिका पदाधिकाऱ्यांनीही व्यापाऱ्यांची बहिष्कारकथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी तयारी केली आहे. त्याचबरोबर २८0 कोटी रुपयांची मदतवजा नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या एलबीटीचा प्रश्न आता राज्याच्या पटलावर गाजत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणच्या व्यापारी प्रतिनिधींना तीन ते चारवेळा चर्चेला बोलावले होते. त्यांच्या काही मागण्यांची दखलही घेण्यात आली. एलबीटीचा प्रश्न आगामी आर्थिक वर्षात संपणार असला तरी, मागील एलबीटीची थकबाकी अजूनही तशीच आहे. नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी महापालिका आयुक्तांना दूरध्वनीवरून, कारवाईबाबत सबुरीने घेण्याचा सल्ला दिल्यामुळे महापालिका प्रशासन सध्या शांत आहे. या गोष्टीचा पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. फडणवीस यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना येत्या १५ मार्च रोजी भेटण्यास बोलावले आहे. देवेंद्रदरबारी आता महापालिका आर्थिक गाऱ्हाणे मांडणार आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेमुळे महापालिकेचा विकास ठप्प झाला आहे. महापालिकेचा अर्थसंकल्पही कोलमडला आहे. शासनाने दूरध्वनीवरून प्रशासनाला सबुरीचा सल्ला दिल्यामुळे प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. अशावेळी शासनाने एलबीटीची थकबाकी, दंड आणि व्याज यापोटी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेस २८0 कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्तावच महापौर विवेक कांबळे यांनी तयार केला आहे. शासनाने व्यापाऱ्यांच्या बाजूने कोणताही निर्णय घेताना नागरिकांचा आणि महापालिकेचा विचार करावा. माफी किंवा सवलत देताना तेवढ्या नुकसानीची तजवीज शासनाने करावी, असेही प्रस्तावात म्हटले आहे. (प्रतिनिधी)मोठे शिष्टमंडळ जाणारमहापौरांसह खासदार रामदास आठवले, माजी मंत्री आ. पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, सभागृह नेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संजय मेंढे, तसेच अनेक नगरसेवक या शिष्टमंडळात असणार आहेत. शासनाचा घटकपक्ष म्हणून आठवले महापालिकेची बाजू मांडणार आहेत, असे कांबळे म्हणाले.