शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विकास नियंत्रण नियमावलीने विकासाचे मजले

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

बांधकाम व्यावसायिकांतून स्वागत : मसुदा तयार करण्यात कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांची मदत

कोल्हापूर : राज्य सरकारने ‘ड’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात एकच विकास नियंत्रण नियमावली अंमलात आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्वच ‘ड’ वर्ग महानगरपालिकाचा समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे कोल्हापुरात काही बांधकाम व्यावसायिकांतून स्वागत होत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास अजून सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे नियमावलीचा मसुदा तयार करण्यात कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांची मोठी मदत झाली. राज्य सरकारने असा निर्णय घेण्यापूर्वी सध्या अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत कोणते बदल करावेत, नवीन कोणते नियम असावेत याबाबत राज्य सरकारने एक अभ्यासगट स्थापन केला होता. या अभ्यास गटाचे सदस्य म्हणून महाराष्ट्र क्रिडाईतर्फे राजीव परिख, राम पुरोहित, गिरीष रायबागे तर आर्किटेक्ट कन्सल्टंट म्हणून नांदेडच्या वास्तुकला कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यास गटात नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. समान विकास नियंत्रण नियमावलीचा कच्चा मसुदा या अभ्यास गटाने राज्य सरकारला सादर केला असून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत.नव्याने अंमलात येणाऱ्या समान विकास नियंत्रण नियमावलीमुळे राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका क्षेत्रात समतोल विकास होण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकांचे उत्पन्न वाढणार आहे. सर्वांना मान्य होतील अशा नियमांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूणच या निर्णयामुळे विकासाला एकसारखी गती मिळणार असल्याचे अभ्यास गटाचे सदस्य राजीव परिख यांनी सांगितले. पुर्वी शहरात चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआाय) एक होता, तो आता १.३० इतका केला जाईल. २४ मीटर रूंदीच्या रस्त्यालगत असलेल्या चाळीस हजार चौरस फुटांच्या बांधकामांना १.३० इतका मूळ एफएसआय, टीडीआर तसेच प्रीमियम भरून .३० इतका एफएसआय घेता येईल. त्यामुळे इमारतीचा एफएसआय तीनपर्यंत जाणार आहे. जो पूर्वी १.८० इतकाच असायचा. या बदलामुळे रस्त्यांलगतच्या इमारती अकरा मजली होऊ शकतात. नव्या नियमावलीत इमारतींच्या भोवतालच्या सामासिक अंतरात बदल करण्यात आले आहेत. पार्किंगबाबतच्या नियमात वाढ करण्यात आली असून पाच टक्के पार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. वीस फ्लॅट असणाऱ्या गृहप्रकल्पांना तसेच हॉटेल, लॉजिंग व मंगल कार्यालये यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच सोलर वॉटर सिस्टीम सक्तीची करण्यात आली आहे. पूररेषेत यापूर्वी बांधकामांना परवानगी दिली जात नव्हती; परंतु यापुढे पूररेषेत काही अटींवर बांधकामाला परवानगी मिळणार आहे. जेथे पाणी येथे, तेथील पाणी पातळीपेक्षा दीड मीटर उंच बांधकाम करावे लागणार आहे. टीडीआर संबंधीचे धोरण एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आले आहे. त्यावर सूचना व हरकती मागविल्या आहेत. यापूर्वी जेवढी जमीन दिली तेवढाच टीडीआर दिला जात असे परंतु आता दोन ते अडीच पट टीडीआर दिला जाईल. त्यामुळे आरक्षणातील जागा विकसीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्यभरातून सूचना व हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला साधारण सहा ते आठ महिन्यांच्या कालावधी जाईल, असे परिख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)