शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

अकिवाटमध्ये लाखो रुपयांची विकासकामे रखडली

By admin | Updated: June 26, 2015 22:05 IST

ग्रामस्थांतून संताप : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मौन; सर्व कामांचा ठेका गावातील एकाच ठेकेदाराला

कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष व ठेकेदाराचा मनमानी कारभार यामुळे सुमारे चाळीस लाखांची कामे रखडली आहेत. विविध योजनेतून निधी मंजूर होऊनही कामात दिरंगाई होत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याबाबत मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गावातील प्रत्येक प्रभागाचा व पर्यायाने गावचा विकास व्हावा यासाठी गावातील प्रमुख मंडळी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी प्रयत्न करून पर्यावरण, १३ वा वित्त आयोग, नागरी सुविधा योजना, दलितवस्ती सुधारणा योजना, आमदार निधी, आदी योजनेतून सुमारे चाळीस लाखांचा निधी आणला आहे. यातून अंतर्गत रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, शौचालय, गटरीच्या कामाचा समावेश आहे. सन २०१३-१४ सालात निधी मंजूर झाला असून, या सर्व कामांचा ठेका गावातीलच एका ठेकेदाराला देण्यात आला आहे.निधी मंजूर असूनही अद्याप अनेक कामे चालूच नाहीत. दलित वस्ती व माळ भागातील गटारीचे काम चालू असून, अर्ध्यावर राहिलेले काम गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंदच आहे. गटारीसाठी चर खुदाई केल्याने व काम अपूर्णच राहिल्याने रहिवाशांना ये-जा करण्यास अडचण झाली आहे. रखडलेल्या कामाबाबत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, ठेकेदाराकडून काम होत नसेल तर ठेकेदारच बदला, अशी भूमिका विरोधी सदस्यांनी घेतली आहे. रखडलेल्या कामासाठी सदस्य एकत्र का येत नाहीत, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करीत आहेत. आम्ही विरोधी बाकावर असूनही विकासकामाला अडथळा करीत नाही, उलट बंद असलेली कामे चालू करा यासाठी सरपंच व ग्रामसेवकांकडे तक्रार केली आहे; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रखडलेल्या कामांबाबत शिरोळचे गटविकास अधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून, ठेकेदाराला काम जमत नसेल तर ठेकेदार बदलण्याची मागणीही करणार आहे.- देवगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अकिवाट.रखडलेल्या कामाबाबत ठेकेदाराकडे पाठपुरावा करीत असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.- निकीता तहसीलदार, सरपंच, ग्रामपंचायत अकिवाट