शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची पाईपलाईन जोडल्यावर विकासगंगा

By admin | Updated: October 27, 2015 00:52 IST

पंकजा मुंडे : महायुतीला सकारात्मक वातावरण असल्याने विरोधकांकडून वेगळे तंत्र

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने दिल्ली विकासाचा हौद बांधण्यात आला आहे. तेथील विकासगंगा कोल्हापूर महापालिकेत येण्यासाठी सत्तेची पाईपलाईन जोडावी लागेल, ती येथील जनतेने जोडावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी सायंकाळी येथे केले.शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे भाजप-ताराराणी आघाडी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोेडे, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष सदाशिवराव खाडे, पुण्याच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांच्यासह उमेदवार विक्रम जरग, अजित ठाणेकर, प्रियांका इंगवले यांची होती.पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजप-ताराराणी आघाडीचे सकारात्मक वातावरण पाहून विरोधकांकडून वेगळे तंत्र वापरले जात आहे, परंतु असे चांगले चांगले गुंड बीडमध्ये आम्ही सरळ केले आहेत. सज्जन माणूस गप्प असतो म्हणून अशा लोकांचे फावते; परंतु जर तो आक्रमक होऊन बाह्णा सरसावतो, तेव्हा हे लोक मागे पळून जातात. जनता जनार्दन ज्याच्या पारड्यात आपला अधिक भार टाकते, त्यांना कोणीही घरात बसवू शकत नाही.छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक लटकत ठेवले, परंतु सत्तेत आल्यावर भाजप सरकारने पर्यावरणाच्या मंजुऱ्या तत्काळ देत स्मारक पूर्ण होण्याचा मार्ग खुला करून दिला. त्यामुळे आम्हीच हे स्मारक पूर्ण करू, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.कोल्हापुरात आल्यावर ठिकठिकाणी डिजिटल फलक दिसले. त्यावर ‘आम्ही थेट पाईपलाईन आणली म्हणून आम्हाला संधी द्या’ असा उल्लेख दिसला. निवडणुका आल्या की पाईपलाईनच्या उद्घाटनांचे नारळ फोडले जातात. माजी मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते अनेकवेळा त्याचे उद्घाटन झाले, परंतु राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरसाठी संभावित थेट पाईपलाईनमधून एक ग्लास पाणीही आमच्या महिला भगिनींना मिळू शकलेला नाही, असा टोलाही मंत्री मुंडे यांनी कॉँग्रेसचे नाव न घेता लगावला.कहा है अच्छे दिन, अशी विरोधकांकडून आता ओरड होत आहे, परंतु गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी केलेले खरकटे काढायला थोडा वेळ लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)