शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

‘तीर्थ’ विकासात ‘क्षेत्र’ संपादनाचेच दिव्य

By admin | Updated: March 7, 2015 01:05 IST

अंबाबाई मंदिर विकास आराखडा : शासन पातळीवर मंदिराबाबत, पुनर्वसनाबाबत ठोस धोरण गरजेचे

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास करताना भूसंपादन आणि नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. यापूर्वीही मंदिर विकासासाठी पाच-सहा आराखडे तयार करण्यात आले. त्यातही भूसंपादनाचाच विषय कळीचा मुद्दा असल्याने त्याला विरोध झाला आहे. त्यामुळे महापालिकेला शासनाचे धोरण आणि विरोध या दोन्ही पातळ््यांवर खिंड लढवावी लागेल. गुरुवारी (दि. ५) शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिराचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि बाह्य परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यात मंदिराबाहेरच्या ३०-४० मीटर परिसरातील भूसंपादन हा महत्त्वाचा विषय आहे. मंदिर शहराच्या मध्यभागी असल्याने त्याला लागून व्यावसायिकांची दुकाने आहेत, रहिवासी आहेत. येथील सर्व इमारती पाडून मंदिराला मुक्त श्वास घेता यावा यासाठीचा प्रस्ताव या आराखड्यात आहे. या इमारती पाडून तेथे बगीचा, लॉन, भाविकांच्या सोयीसाठी दर्शनमंडप, प्रसादालय, विश्रांतीगृह, माहितीकेंद्र असे नियोजन आहे. भूसंपादनासाठी ४५ कोटी आणि पुनर्वसनासाठी २२-२३ कोटी रुपये अशी त्यात तरतूद केली आहे. यापूर्वी मंदिर केंद्रस्थानी ठेवून शहराच्या विकासासाठी दोन हजार कोटी, त्यानंतर १२० कोटी, १९० कोटी आणि आता अडीचशे कोटींचा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. या आराखड्यांमध्येही परिसरातील भूसंपादनाचा विषय आल्याने नागरिकांनी याआधीच त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मंदिराच्या विकास प्रकल्पामुळे ज्या-ज्या कुटुंबांना आणि व्यापाऱ्यांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे, त्यांचे पूर्णत: पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतल्याशिवाय हा प्रकल्प पुढे सरकणार नाही. त्यामुळे पुनर्वसन कुठे आणि कशा पद्धतीने केले जाणार आहे, यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद अवलंबून आहे.