शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

‘तीर्थ’ विकासात ‘क्षेत्र’ संपादनाचेच दिव्य

By admin | Updated: March 7, 2015 01:05 IST

अंबाबाई मंदिर विकास आराखडा : शासन पातळीवर मंदिराबाबत, पुनर्वसनाबाबत ठोस धोरण गरजेचे

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास करताना भूसंपादन आणि नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर होणार आहे. यापूर्वीही मंदिर विकासासाठी पाच-सहा आराखडे तयार करण्यात आले. त्यातही भूसंपादनाचाच विषय कळीचा मुद्दा असल्याने त्याला विरोध झाला आहे. त्यामुळे महापालिकेला शासनाचे धोरण आणि विरोध या दोन्ही पातळ््यांवर खिंड लढवावी लागेल. गुरुवारी (दि. ५) शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अंबाबाई मंदिराचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि बाह्य परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यात मंदिराबाहेरच्या ३०-४० मीटर परिसरातील भूसंपादन हा महत्त्वाचा विषय आहे. मंदिर शहराच्या मध्यभागी असल्याने त्याला लागून व्यावसायिकांची दुकाने आहेत, रहिवासी आहेत. येथील सर्व इमारती पाडून मंदिराला मुक्त श्वास घेता यावा यासाठीचा प्रस्ताव या आराखड्यात आहे. या इमारती पाडून तेथे बगीचा, लॉन, भाविकांच्या सोयीसाठी दर्शनमंडप, प्रसादालय, विश्रांतीगृह, माहितीकेंद्र असे नियोजन आहे. भूसंपादनासाठी ४५ कोटी आणि पुनर्वसनासाठी २२-२३ कोटी रुपये अशी त्यात तरतूद केली आहे. यापूर्वी मंदिर केंद्रस्थानी ठेवून शहराच्या विकासासाठी दोन हजार कोटी, त्यानंतर १२० कोटी, १९० कोटी आणि आता अडीचशे कोटींचा विकास आराखडा बनविण्यात आला आहे. या आराखड्यांमध्येही परिसरातील भूसंपादनाचा विषय आल्याने नागरिकांनी याआधीच त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मंदिराच्या विकास प्रकल्पामुळे ज्या-ज्या कुटुंबांना आणि व्यापाऱ्यांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे, त्यांचे पूर्णत: पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतल्याशिवाय हा प्रकल्प पुढे सरकणार नाही. त्यामुळे पुनर्वसन कुठे आणि कशा पद्धतीने केले जाणार आहे, यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद अवलंबून आहे.