शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:49 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सध्या ‘उत्साही’ अधिकाऱ्यांच्या गर्तेत लटकला आहे.आराखड्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५३९० ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सध्या ‘उत्साही’ अधिकाऱ्यांच्या गर्तेत लटकला आहे.आराखड्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५३९० तक्रारी निवारणासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला बैठक अथवा सुनावणी घेण्याचे भानच राहिलेले नाही. शासनाने समिती स्थापन करून तीन महिने उलटले. सप्टेंबरअखेर या तक्रारींचे निवारण करून शासनाला अहवाल सादर करणे आवश्यक असतानाही समितीचे सर्व कामकाज अद्याप ‘जैसे थे’ आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सुमारे ३८ वर्षांनंतर तयार होत आहे. महामार्गाला पर्यायी रस्ते, नागरी-ग्रामीण संकुले, तालुका मुख्यालये, रिंग रोड, पर्यटन विकासासाठी रस्त्यांचे जाळे, व्याघ्र प्रकल्प, आदींचा विकास नियंत्रण नियमावलीचा समावेश असणारा हा प्रादेशिक आराखडा तयार झाला; पण हा आराखडा सर्वसमावेशक समतोल ठेवणारा नसल्याची टीकाही यावेळी झाली. अनावश्यक रस्त्यांचे जाळे, अनावश्यक ट्रान्स्पोर्ट हबमुळे शेतकºयांची शेती, विहिरी, घरे उद्ध्वस्त होऊन शेतकरी अडचणीत आल्याच्या तक्रारी झाल्या. त्यातूनही हा विकास आराखडा सप्टेंबर २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला. सुनावण्यांनंतर जानेवारी २०१८ मध्ये शासनाने तो मंजूर केला; पण असंख्य तक्रारींमुळे मोर्चे निघाले. चौका-चौकांत आराखड्याच्या प्रती जाळल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणावरही अन्याय होणार नाही अशी घोषणा केली. शासनाच्या वतीने मंजूर प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्टÑ प्रादेशिक नियोजन व नगररचना नियमानुसार फेरबदलाची कार्यवाही सुचविण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. समितीने एकत्रित बैठक घेणे, हरकतींवर सुनावणी घेणे तसेच ३० सप्टेंबरपूर्वी योजनेतील सर्व त्रुटी निदर्शनास आणून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करायचा आहे.शासनाचे निर्देश पायदळीसमिती नेमून तीन महिने झाले, तरीही समितीची एकही बैठक झाल्याचे दिसून येत नाही. तसेच सुनावणी घेण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रांत जाहिरात देणे आवश्यक आहे. समितीने सर्व हरकती, सूचना, तक्रारी, सुनावणी घेण्यासाठी वेळ व ठिकाणे निश्चित करणे आवश्यक आहे; पण अशा काहीही हालचाली केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्याच्या नावाखाली गेले तीन महिने या त्रिसदस्यीय समितीकडून लोकांना फसविण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत.त्रिसदस्यीय समितीकलम २० अन्वये आराखड्यातील फेरबदलाची कार्यवाही सुचवून अहवाल सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष कोल्हापूर प्रादेशिक योजना नगररचनाचे उपसंचालक शिवराज पाटील हे असून, कोल्हापूर शाखा कार्यालयाचे सहायक संचालक नगररचनाकार धनंजय खोत आणि नगररचना विभागाचे निवृत्त उपसंचालक य. श. कुलकर्णी यांचा समावेश आहे.