शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:49 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सध्या ‘उत्साही’ अधिकाऱ्यांच्या गर्तेत लटकला आहे.आराखड्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५३९० ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली राज्यमार्गाला पर्यायी रस्ता, कोल्हापूर शहराबाहेरुन रिंग रोड, इचलकरंजीसह काही नागरी संकुलांमध्ये बायपास रस्ते, नागरी विकास केंद्र असा भविष्यातील २० वर्षांचा विचार करून तयार केलेला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सध्या ‘उत्साही’ अधिकाऱ्यांच्या गर्तेत लटकला आहे.आराखड्याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५३९० तक्रारी निवारणासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीला बैठक अथवा सुनावणी घेण्याचे भानच राहिलेले नाही. शासनाने समिती स्थापन करून तीन महिने उलटले. सप्टेंबरअखेर या तक्रारींचे निवारण करून शासनाला अहवाल सादर करणे आवश्यक असतानाही समितीचे सर्व कामकाज अद्याप ‘जैसे थे’ आहे.कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आराखडा सुमारे ३८ वर्षांनंतर तयार होत आहे. महामार्गाला पर्यायी रस्ते, नागरी-ग्रामीण संकुले, तालुका मुख्यालये, रिंग रोड, पर्यटन विकासासाठी रस्त्यांचे जाळे, व्याघ्र प्रकल्प, आदींचा विकास नियंत्रण नियमावलीचा समावेश असणारा हा प्रादेशिक आराखडा तयार झाला; पण हा आराखडा सर्वसमावेशक समतोल ठेवणारा नसल्याची टीकाही यावेळी झाली. अनावश्यक रस्त्यांचे जाळे, अनावश्यक ट्रान्स्पोर्ट हबमुळे शेतकºयांची शेती, विहिरी, घरे उद्ध्वस्त होऊन शेतकरी अडचणीत आल्याच्या तक्रारी झाल्या. त्यातूनही हा विकास आराखडा सप्टेंबर २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला. सुनावण्यांनंतर जानेवारी २०१८ मध्ये शासनाने तो मंजूर केला; पण असंख्य तक्रारींमुळे मोर्चे निघाले. चौका-चौकांत आराखड्याच्या प्रती जाळल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणावरही अन्याय होणार नाही अशी घोषणा केली. शासनाच्या वतीने मंजूर प्रादेशिक योजनांमध्ये महाराष्टÑ प्रादेशिक नियोजन व नगररचना नियमानुसार फेरबदलाची कार्यवाही सुचविण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. समितीने एकत्रित बैठक घेणे, हरकतींवर सुनावणी घेणे तसेच ३० सप्टेंबरपूर्वी योजनेतील सर्व त्रुटी निदर्शनास आणून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करायचा आहे.शासनाचे निर्देश पायदळीसमिती नेमून तीन महिने झाले, तरीही समितीची एकही बैठक झाल्याचे दिसून येत नाही. तसेच सुनावणी घेण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रांत जाहिरात देणे आवश्यक आहे. समितीने सर्व हरकती, सूचना, तक्रारी, सुनावणी घेण्यासाठी वेळ व ठिकाणे निश्चित करणे आवश्यक आहे; पण अशा काहीही हालचाली केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्याच्या नावाखाली गेले तीन महिने या त्रिसदस्यीय समितीकडून लोकांना फसविण्याचे काम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत.त्रिसदस्यीय समितीकलम २० अन्वये आराखड्यातील फेरबदलाची कार्यवाही सुचवून अहवाल सादर करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष कोल्हापूर प्रादेशिक योजना नगररचनाचे उपसंचालक शिवराज पाटील हे असून, कोल्हापूर शाखा कार्यालयाचे सहायक संचालक नगररचनाकार धनंजय खोत आणि नगररचना विभागाचे निवृत्त उपसंचालक य. श. कुलकर्णी यांचा समावेश आहे.