शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘प्रोत्साहनपर’च्या गाजराने विकास संस्था अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:21 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यानंतर नियमित परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजारांपर्यंत प्रोत्साहनपर ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यानंतर नियमित परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. मात्र गेली वर्षभर त्यांच्या पदरात अद्याप आश्वासनापलीकडे काहीच पडलेले नाही. त्यामुळे कर्ज थकल्यानंतरच सरकार माफ करणार असेल, तर परतफेड करायची कशाला? अशी मानसिकता वाढली आहे. त्यामुळे विकास संस्था अडचणीत आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा कर्ज असो अथवा सरकारी देणी परतफेड करण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळेच येथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या कमी पाहावयास मिळते. जिल्ह्यात अडीच लाख खातेदार कर्जदार आहेत. त्यापैकी तब्बल १ लाख ७५ हजार हे नियमित परतफेड करणारे आहेत. त्यामुळे येथे कर्जमाफीपेक्षा प्रोत्साहनपर अनुदानाचा अधिक फायदा शेतकऱ्यांना होताे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी दोन लाखांपर्यंतच्या थकीत शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. यामध्ये जिल्ह्यातील ३२ हजार ५५३ शेतकरी १६४ कोटी ६३ लाख कर्जमाफीस ठरले. यातील बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभही मिळाला. त्याचबरोबर नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मागीलवर्षी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केल्याचे मंत्र्यांनी जाहीर केले. त्यानंतर कोरोना आल्याने ही प्रक्रिया थोडी लांबणीवर पडली. मात्र सरकारने घोषणा करून वर्ष उलटले तरी, अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत. या अर्थसंकल्पात तरीही अर्थमंत्री घोषणा करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. यावेळेलाही गाजर दाखवण्याचे काम केले. राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या शेतकऱ्यांना पैसे देऊ, असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या सगळ्याचा परिणाम विकास संस्थांवर झाला आहे. पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करण्यापेक्षा थकीत ठेवण्याची मानसिकता वाढू लागली असून, ही संस्थांच्या दृष्टीने घातक आहे. साखर कारखान्यांना दुसऱ्याच्या नावावर ऊस पाठवून बिले घेतली जात आहेत. अगोदरच जिल्ह्यात ८०८० विकास संस्था तोट्यात आहेत.

शंभर टक्के वसुलीची प्रमाण घटले

जिल्ह्यात विकास संस्थांच्या पातळीवर शंभर टक्के वसुलीसाठी स्पर्धाच सुरू असते. मात्र यंदा थकबाकीदारांसाठी सततची होणारी कर्जमाफी पाहता, कर्ज परतफेडीची मानसिकता कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे संस्थांचे शंभर टक्के कर्जवसुलीचे प्रमाण घटले आहे.

व्याज सवलतीने संस्था आतबट्यात

विकास संस्थांचा डोलारा हा कर्ज वाटपातील व्याजाच्या मार्जिनवर अवलंबून असतो. मात्र एक लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्यास सुरुवात केल्याने हे मार्जिन कमी झाले. त्यात आता तीन लाखांपर्यंत सवलत दिल्याने संस्थांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

‘प्रोत्साहनपर’चा ५२५ कोटींचा लाभ शक्य

जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार शेतकरी हे नियमित परतफेड करणारे आहेत. प्रत्येकाला सरासरी तीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे म्हटले, तर जिल्ह्यासाठी ५२५ कोटींची गरज आहे.

दृष्टिक्षेपात कर्जमाफी-

योजना शेतकरी कर्जमाफीची रक्कम

महात्मा फुले २७ हजार ८७१ १३९ कोटी ९० लाख ४४ हजार

अतिवृ्ष्टी/महापूर ८७ हजार ३४० २५८ कोटी ४६ लाख १० हजार