शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

धनगरवाड्यावर विकासाचा बनाव

By admin | Updated: May 6, 2015 00:15 IST

पाण्याच्या योजनेवर राजकारणाचा वरवंटा : गावात येण्यासाठी पक्का रस्ता, अंतर्गत रस्ता, दिवाबत्तीची सोयच नाही

मच्छिंद्र मगदूम -सांगरुळ  उपवडे लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या पश्चिमेकडील डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मठाचा व मारुतीचा धनगरवाड्यावर विकासाचा बनाव सुरू आहे. दोन्ही वाड्यांवर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. पाण्याच्या योजना तीन वर्षे रखडल्याने आजही लोक पाण्यासाठी डोंगरात वणवण फिरत आहेत. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावेत, एवढीच मागणी येथील नागरिकांतून होत आहे.देशाला स्वातंत्र मिळून आज ६८ वर्षे उलटली, तरीही खेड्यापाड्यांत, डोेंगरदऱ्यांत वसलेल्या वाड्या-वस्त्यांवर विकास मात्र पोहोचला नाही, असेच हे विकासापासून वंचित राहिलेले दोन धनगरवाडे. आजही येथील लोकांना विकास म्हणजे काय? हे माहीत नाही. तीन वर्षांपूर्वी शतकोटी वृक्ष लागवड करण्यासाठी रस्ता करण्यात आला. त्यामुळे दोन वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता झाला. संपूर्ण रस्ता डोंगरी भागात असल्याने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने रस्ता तुटून गेला आहे. वृक्ष लागवडीचे काम पूर्ण झाल्याने याकडे कुणाचेच लक्ष नाही. धनगरवाड्यावर चारचाकी वाहन घेऊन जायचे झाल्यास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.दरम्यान, येथील लोकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन नेत्यांनी व प्रशासनाने यासाठी निधी मंजूर करून दिला; पण त्याचे कामही ठेकेदाराच्या मर्जीनेच चालले आहे. काम सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली, तरी त्याचे पाणी अद्यापही येथील लोकांना मिळालेले नाही. मठाच्या धनगरवाड्यावर विहिरीत मोटार बसविली आहे. साठवणुकीसाठी टाकीही बांधली आहे. ठेकेदाराने बिलेही उचलली आहेत; पण पाण्याचा पत्ताच नाही. निव्वळ राजकीय द्वेषापोटी पाण्याची योजना सुरू केलेली नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र मेटाकुटीस आला आहे.मारुतीच्या धनगरवाड्याचीही परिस्थिती काय वेगळी नाही. वाड्यावरची पाण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीत बराच कचरा असून, पाण्याला दुर्गंधी येते. त्यामुळे तेथील नागरिक ते पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत. आजही येथील लोक पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याचाच आधार घेतात. ग्रामपंचायतीने विहिरीतील संपूर्ण पाणी काढून गाळ व कचरा काढून धनगरवाड्याला स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे.पाण्यासाठी डोंगरात वणवणवसलेल्या मठाचा व मारुतीचा धनगरवाड्यावर ग्रामपंचायतीचे दुर्लक्षकित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावेत, एवढीच मागणीपाण्याच्या योजना तीन वर्षे रखडल्याने आजही लोक पाण्यासाठी डोंगरात वणवण फिरतात. धनगरवाड्यावर पाण्याची योजना तातडीने सुरू करावी. तसेच अंतर्गत रस्ते करून दिवाबत्तीची सोय करावी. - संभाजी आडूळकर(ग्रामस्थ, मठाचा धनगरवाडा)ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, ती विहीर स्वच्छ करावी. वाड्यावरील विजेचे खांब सडले आहेत. ते पडण्याच्या स्थितीत आहेत. जीवितहानी होण्यापूर्वी ते खांब बदलावेत. - आंबुबाई मिसाळ (ग्रामपंचायत सदस्या)