शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

पुरोगामी विचारवंतांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार

By admin | Updated: November 25, 2015 00:54 IST

संघर्ष यात्रांचा समारोप

कोल्हापूर : देशातील सांस्कृतिक बहुविविधता नष्ट करायचा प्रयत्न करणाऱ्या मूलतत्त्ववादी शक्तींचा आम्ही सर्व ताकदीनिशी प्रतिकार करू. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांचे वारसदार म्हणून त्यांचे कार्य आम्ही पुढे नेऊ. त्यासाठी जीवन समर्पित करू, अशी प्रतिज्ञा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मंगळवारी येथे केली. पुरोगामी विचारवंतांचे खूनसत्र थांबले पाहिजे. त्यांचे मारेकरी व सूत्रधारांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठीच्या संघर्ष यात्रांचा समारोप झाला. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनातर्फे आयोजित संघर्षयात्रा, आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व आॅल इंडिया यूथ फेडरेशनची ‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ संघर्षयात्रा सकाळी अकरा वाजता सागरमाळ येथे एकत्रित आल्या. येथे कॉ. पानसरे यांच्या निवासस्थानासमोर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी प्रतिज्ञा दिली. ‘लोकभूमी’ मासिकाच्या कॉ. पानसरे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, उमा पानसरे, मेघा पानसरे, स्मिता पानसरे, बन्सी सातपुते, कॉ. भालचंद्र कानगो, भारत पाटणकर, प्रकाश रेड्डी, तुकाराम भस्मे, किशोर जाधव, एस. बी. पाटील, सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, आदी उपस्थित होते. दरम्यान, ‘एआयएसएफ’ व ‘एआयवायएफ’ने २२ नोव्हेंबरपासून कॉ. पानसरे यांच्या जन्मभूमी कोल्हारपासून संघर्षयात्रा सुरू केली. तेथून ही यात्रा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील ताराराणी चौकात आली. तिचे स्वागत पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले. (प्रतिनिधी)