शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार

By admin | Updated: April 13, 2017 00:59 IST

‘लोकमत’मधील वृत्ताने खळबळ; सर्वपक्षीय येणार एकत्र, तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची जागेअभावी परवड

कोल्हापूर/आजरा : आजरा शहराशेजारी असणाऱ्या संस्थानकालीन बागांमधील एक इंचही जमीन कुणालाही न देण्याचा निर्धार आजरा तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. भुदरगड तालुक्यातील नागनवाडी प्रकल्पग्रस्तांसाठी आजऱ्यातील ५५ एकर जमीन देण्याबाबत महसूल खात्याचा दबाव असल्याचे वृत्त बुधवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली. ‘लोकमत’च्या या वृत्तामध्ये कशा पद्धतीने ही जमीन घेऊन ती भुदरगडच्या प्रकल्पग्रस्तांसाठी देण्याचे नियोजन आहे याची सविस्तर मांडणी करण्यात आली होती. मुळात आजरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची अजून जागेअभावी परवड सुरू असताना अन्य तालुक्यांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ही जमीन देण्याचा प्रस्ताव येतोच कसा, अशी विचारणा सकाळपासूनच सुरू झाली.श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई यांनी याप्रश्नी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी दिवसभर याबाबत सर्वपक्षीयांशी संपर्क साधत याबाबत हालचाली सुरू केल्या. अशा पद्धतीने आजरा तालुक्यातील राखीव क्षेत्रातील या बागा कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त होणार नाहीत यासाठी त्यांनी सर्वांशी चर्चा केली. त्यानुसार दोन दिवसांत याबाबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. इकडे या बातमीनंतर कृषी विभागानेही अशाप्रकारच्या जमिनींबाबतच्या हस्तांतरणाविषयीचे आदेश एकत्र करून ही जमीन कशा पद्धतीने महसूल विभागाला घेता येणार नाही यासाठीची कागदपत्रे तयार केली आहेत. त्यानुसार विभागीय कृषी सहसंचालकांनी अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून ही जमीन महसूल विभागाच्या नावे होऊ नये यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश दिले असून हा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. तोपर्यंत संबंधितांनी आजरा तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे पूर्वआदेश दाखवून ही कारवाई स्थगित करण्याची मागणी करण्याचे आदेश दिले आहेत. जागा हस्तांतरणाचे प्रस्तावच स्वीकारू नयेतबीज गुणन केंद्रे आणि कृषी चिकि त्सालये ही शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे यासाठी आणि कृषीपूरक उपक्रमांसाठी आहेत. अशा जमिनीच्या मागणीसाठी शासकीय विभाग, स्वायत्त संस्था, अशासकीय खासगी संस्था, व्यक्ती यांच्यामार्फत प्राप्त होणारे कोणतेही प्रस्ताव स्वीकारू नयेत व त्याची शिफारस करण्यात येऊ नये, असा स्पष्ट लेखी आदेश कृषी विभागाने १६ एप्रिल २०१० व ८ सप्टेंबर २०११ रोजी काढले आहेत. या आदेशाआधारे आता कृषी विभाग आपली जमीन कोणत्याही परिस्थिती जावू न देण्यासाठी आक्रमक झाला आहे.एकीकडे आजरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले असताना भुदरगड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी आजऱ्याचीच ही जागा कशी दिसली, हा खरा संशोधनाचा विषय आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जमीन आजरा तालुक्याची आहे. ती हातातून जावू दिली जाणार नाही. त्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारू.- विष्णुपंत केसरकर, माजी सभापती, पंचायत समिती आजरा ‘श्रमुद’ उभारणार सर्वपक्षीय आंदोलनलाभक्षेत्रातील बड्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी लाभक्षेत्राचे संपादन थांबवून विशेष राखीव आणि कृषी प्रकल्प असलेल्या जमिनी पुनर्वसनाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या महसूल ताब्यात घेऊ शकत नाही, असे मत कॉ. संपत देसाई यांनी व्यक्त केले.नागनवाडी व चिकोत्रा धरणाच्या लाभक्षेत्रात संपादन पात्र जमिनी उपलब्ध असताना कागल तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून महसूलने हे षड्यंत्र रचले आहे.नागनवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात स्लॅबपात्र जमीन संपादन करून गजर पडल्यास नैसर्गिक आणि भौगोलिक संलग्नेचा विचार करून चिकोत्रा खोऱ्यातील जमिनी वाटप करणे योग्य होऊ शकते. खरोखरच या जमिनी प्रकल्पग्रस्तांना वाटप करायच्या असतील, तर उचंगी आणि सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचा प्रथम हक्क आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यात लक्ष घालून वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन करणाऱ्या बागा वाचवाव्यात, अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संपत देसाई यांनी दिला आहे. गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी असलेल्या या बागांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उपक्रम होत आले आहेत. मसाला बाग येथे कार्यरत होती. अशा परिस्थितीत कुणाला तरी उठून अशी जमीन देणे शोभणारे नाही. या विरोधात सर्व मतभेद विसरून आम्ही लढा द्यायला तयार आहोत. - जयवंतराव शिंपी, जिल्हा परिषद सदस्यआजरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी या बागा राखीव ठेवण्यात आल्या. सध्या तेथे काही उपक्रम सुरू आहेत. आणखी काही योजना तेथे आणण्याचे नियोजन आहे. असे असताना दुसऱ्या तालुक्यासाठी या तालुक्यातील जमीन देण्याला आमचा विरोध राहील. यासाठीच्या आंदोलनात आम्ही अग्रेसर राहू. - अरुण देसाई, तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष