शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

खोळंबा अन् प्रवाशांचे हाल

By admin | Updated: December 19, 2015 01:06 IST

एस. टी. कर्मचारी आंदोलन : पोलिसांबरोबर शाब्दिक चकमक; दुपारनंतर आंदोलन मागे

कोल्हापूर : राज्यातील महाराष्ट्र एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स, काँग्रेस (इंटक)च्या कामगारांचे गुरुवारपासून सुरु असलेले आंदोलन शासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याने शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आले. मात्र दुपारपर्यंत जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली. सकाळी सव्वाबाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी बस रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच आंदोलक नरमले. ‘गांधीगिरी’ पद्धतीने चालकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. अन्य महामंडळे व राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा ‘एस.टी’मध्ये अत्यंत कमी पगार आहे. कामगार करार २०१२-१६ रद्द करून एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सभासद गुरुवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांतील चालक, वाहक, तांत्रिक या विभागांतील ७०० कर्मचारी काम बंद करून संपात सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठपासून पुन्हा ‘इंटक’चे राज्याचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळुंखे, विजय सणगर, रूपाली पाटील, सारिका पाटील, सुरेश गवळी, बजरंग चव्हाण, सुनंदा काळे, सारिका शिंदे, सयाजी घोरपडे, सुनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मारला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. साडेअकरा ते साडेबारा या वेळेत आंदोलकांनी काही बसेस अडविण्याचा प्रयत्न केला. त्वरित पोलिसांचा फौजफाटा आला. त्यांनी आंदोलकांना बाजूला करून बससेवा सुरळीत केली. आंदोलक आक्रमकपणे बस रोखण्यासाठी जात होते. त्यावेळी ‘काल ताब्यात घेऊन सोडून दिले होते, आज गुन्हा दाखल करतो,’ असा दम शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी काही काळ पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेत शांततेने संप सुरू ठेवला. दरम्यान, बसवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच फलाटांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. बससंबंधी विचारणा करण्यासाठी चौकशी कक्षात झुंंबड उडाली होती. प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याने एस.टी. प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. नाइलाजास्तव काही प्रवाशांनी खासगी वाहनांतून जाणे पसंत केले.