शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

उद्ध्वस्त पीक.... हतबल शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST

शशिकांत भोसले लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) ...

शशिकांत भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावांंना वळवाच्या पावसासह जोरदार बर्फवृष्टीने झोडपून काढले. यामुळे शेतातील सर्व पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. वळीव पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडून पडले आहे. या पार्श्वभूमीवर आज कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने या भागात दौरा करून नुकसानीची पाहणी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी या परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड, काकडी, बावची, वांगी , दोडका, मिरची, मका, ज्वारीचे प्लांट केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण वळीव पावसाचा तडाखा सोबत जोरदार बर्फवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाजीपाला व कलिंगड, काकडी, ऊसपीकासह शेतातील संपूर्ण पीकच जमिनदोस्त झाले आहे. गारपिटीने ऊसाच्या पालाच्या अक्षरशः चिंध्या- चिंध्या झाल्या असून झाडांची अवस्थाही दयनीय झाली आहे. संपूर्ण पाला झडून गेला आहे. झाडांचे आंबे तर मातीत कुजून गेले आहेत.

अर्जुनवाडा

गारपिटीने अर्जुनवाडा, नंद्याळ, करड्याळ, मुगळी, जैन्याळ गावातील भाजीपाला व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या गावातील शेतकऱ्यांना तातडीने विशेष पॅकेज देऊन नुकसान भरपाई द्यावी. तत्काळ पंचनामे सुरू करावेत. नुकसानीचा आकडा मोठा असल्याने शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.

कोट...

नंद्याळ येथे कोरोनामुळे मोठे संकट उभारले असतानाही या परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. पण सोमवारी झालेल्या गारपिटीने या सगळ्यावर पाणी फेरले आहे.. हातातोंडाशी आलेले सर्व पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागला आहे. शेतकरी हतबल झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.

सागर पाटील, प्रगतशील शेतकरी ,

नुकसानीची पाहणी करून शासनाला अहवाल देणार

मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज कृषी विद्यापीठमधील तज्ज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी मिळून या परिसरात झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहणी केली. तत्काळ काय उपाययोजना करता येतील याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तज्ज्ञ समितीकडून याबाबत शासनाकडे अहवाल देण्यात येईल. शासनाचे पुढील आदेश आल्यानंतरच पंचनामे करण्यात येतील,असे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी सांगितले.

फोटो:- नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावात जोरदार वळीव व बर्फवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करताना उपविभागीय कृषी अधिकारी आर.जी.पाठक, तालुका कृषी अधिकारी ए. डी .भिंगारदिवे, मंडल कृषी अधिकारी ए. ए. माने, कृषी सहाय्यक सुनील बुगडे, कृषी सहाय्यक संदीप कांबळे, तलाठी पी. ए. कांबळे, कृषी मित्र दिलीप पाटील