शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त पीक.... हतबल शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST

शशिकांत भोसले लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) ...

शशिकांत भोसले

लोकमत न्यूज नेटवर्क

सेनापती कापशी : सोमवारी सायंकाळी चिकोत्रा खोऱ्यातील नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावांंना वळवाच्या पावसासह जोरदार बर्फवृष्टीने झोडपून काढले. यामुळे शेतातील सर्व पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. वळीव पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडून पडले आहे. या पार्श्वभूमीवर आज कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने या भागात दौरा करून नुकसानीची पाहणी केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उद्योग व्यवसाय बंद पडत असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी या परिसरातील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कलिंगड, काकडी, बावची, वांगी , दोडका, मिरची, मका, ज्वारीचे प्लांट केले. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, पण वळीव पावसाचा तडाखा सोबत जोरदार बर्फवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भाजीपाला व कलिंगड, काकडी, ऊसपीकासह शेतातील संपूर्ण पीकच जमिनदोस्त झाले आहे. गारपिटीने ऊसाच्या पालाच्या अक्षरशः चिंध्या- चिंध्या झाल्या असून झाडांची अवस्थाही दयनीय झाली आहे. संपूर्ण पाला झडून गेला आहे. झाडांचे आंबे तर मातीत कुजून गेले आहेत.

अर्जुनवाडा

गारपिटीने अर्जुनवाडा, नंद्याळ, करड्याळ, मुगळी, जैन्याळ गावातील भाजीपाला व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या गावातील शेतकऱ्यांना तातडीने विशेष पॅकेज देऊन नुकसान भरपाई द्यावी. तत्काळ पंचनामे सुरू करावेत. नुकसानीचा आकडा मोठा असल्याने शेतकरी आता शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे.

कोट...

नंद्याळ येथे कोरोनामुळे मोठे संकट उभारले असतानाही या परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. पण सोमवारी झालेल्या गारपिटीने या सगळ्यावर पाणी फेरले आहे.. हातातोंडाशी आलेले सर्व पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागला आहे. शेतकरी हतबल झाला असून यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.

सागर पाटील, प्रगतशील शेतकरी ,

नुकसानीची पाहणी करून शासनाला अहवाल देणार

मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज कृषी विद्यापीठमधील तज्ज्ञ व कृषी विभागाचे अधिकारी मिळून या परिसरात झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहणी केली. तत्काळ काय उपाययोजना करता येतील याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तज्ज्ञ समितीकडून याबाबत शासनाकडे अहवाल देण्यात येईल. शासनाचे पुढील आदेश आल्यानंतरच पंचनामे करण्यात येतील,असे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी सांगितले.

फोटो:- नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, मुगळी, जैन्याळ (ता. कागल) आदी गावात जोरदार वळीव व बर्फवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करताना उपविभागीय कृषी अधिकारी आर.जी.पाठक, तालुका कृषी अधिकारी ए. डी .भिंगारदिवे, मंडल कृषी अधिकारी ए. ए. माने, कृषी सहाय्यक सुनील बुगडे, कृषी सहाय्यक संदीप कांबळे, तलाठी पी. ए. कांबळे, कृषी मित्र दिलीप पाटील