शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

निर्बंध लागू तरी सरकारी कार्यालयातील गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:24 IST

कोल्हापूर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून राज्यभर कठोर निर्बंध लागू झाले खरे; पण कोल्हापुरात त्याचे काहीही परिणाम निदान पहिल्या ...

कोल्हापूर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून राज्यभर कठोर निर्बंध लागू झाले खरे; पण कोल्हापुरात त्याचे काहीही परिणाम निदान पहिल्या दिवशी तरी झालेले दिसले नाहीत. सरकारी कार्यालयातील गर्दी नेहमीप्रमाणे तुडुंब होती. ३१ मार्च ही आर्थिक वर्षाची सांगता जवळ आल्याने कोरोनाच्या भीतीपेक्षा कामाची पूर्तता महत्त्वाची असल्याने कार्यालये गजबजलेलीच होती. कामे करून देणारे व कामे घेऊन येणारेही काम कधी पूर्ण होईल, या विवंचनेत आहेत.

मंगळवारपासून राज्यभर निर्बंध लागू झाले आहेत. यात सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के करण्याचे धाेरण निश्चित केले आहे. पण याची अंमलबजावणी पहिल्या दिवशी झाली नाही. नेहमीप्रमाणेच कर्मचारी कामावर आले. त्यामुळे नेहमीप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन विभाग, करवीर तहसीलसह बहुतांश सरकारी कार्यालये गजबजलेलीच दिसली. महिनाअखेर असल्याने सर्वांवरच काम पूर्ण करण्याचा ताण आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या नियमामुळे याची पूर्तता करायची कशी, असा नवाच पेच समोर उभा ठाकला आहे.

महिनाअखेरमुळे आरटीओ विभागात कामाचा ढीग लागला आहे. परवाना नूतनीकरणाच्या कामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे येथे कामे करवून घेण्यासाठी अक्षरशा झुंबड उडाली आहे. जिल्हा परिषदेत या महिनाअखेरच्या आधी वैयक्तिक लाभाच्या योजनातील लाभार्थ्यांना खरेदी पावत्या जमा कराव्या लागणार आहेत. ठेकेदारांची बिले काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध योजनांचा निधी खर्च करण्यासाठी, विविध याेजनांच्या लाभासाठी भेटीगाठी यामुळे जिल्हा परिषद हाऊसफुल्ल झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. वार्षिक आढाव्याची कामे असल्याने प्रत्येक विभागात लगबग सुरू आहे. तेथेही सरकारी निर्बंधाचा कुठे परिणाम झाला आहे, असे दिसले नाही.

चौकट ०१

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असा अनुभव असल्याने कोणत्याही परिस्थितीत कामे करवून घेण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. एकदाचा कोरोना परवडला; पण सरकारी बाबूगिरी नको. त्यामुळे तोंडाला मास्क लावतो, योग्य खबरदारी घेतो; पण कार्यालयात येऊन काम करवून घेतो, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.

फोटो: १६०३२०२१-कोल-कोरोना आरटीओ

फोटो ओळ: निर्बंध लागू झाले तरी प्रादेशिक परिवहन विभागात गर्दी काही कमी झालेली नाही. मंगळवारी दुपारी कार्यालय असेच तुडुंब भरलेले पाहून खरेच निर्बंध लागले का, हे पुन्हा एकदा तपासावे लागत होते. (छाया: नसीर अत्तार)