शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पात्र असूनही अनेकजण रेशनपासून वंचित : तांत्रिक कारणांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:41 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.

कोल्हापूर : रेशनच्या लाभासाठी पात्र असूनही निव्वळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील अनेकजणांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून या लाभार्थ्यांना किमान पुढील महिन्यापासून तरी धान्य पुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. धान्याच्या दर्जाबाबत अद्याप तरी कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. असे असले जिल्ह्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे रेशनच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

यामध्ये लाभार्थ्याने कागदपत्रे दुकानदाराकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्याची आॅनलाईन नोंद झालेली नाही. तसेच रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची संख्या आणि आॅनलाईन नोंद (उदा. कार्डवरील लाभार्थी संख्या १० असल्यास आॅनलाईनद्वारे ती आठजणांची दिसत आहे) याचा मेळ बसत नाही. यामुळे ग्राहक व रेशन दुकानदार यांच्यात वादाचे प्रकार होत आहेत. पॉस मशीनवरील आधार कार्डाची नोंदणीच अद्याप काही ठिकाणी झाली नसल्याचे दिसत आहे. पुरवठा विभागाने या तांत्रिक त्रुटी दूर करून या महिन्याचे नसले तरी पुढील महिन्यापासून तरी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. 

तांत्रिक त्रुटीमुळे पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळत नसेल तर या संदर्भात माहिती घेऊन त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न राहील. तसेच या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल.- दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी

पॉस मशीनवरील आधार कार्डच्या नोंदणीच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक रेशन लाभार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. त्रुटी दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने तंत्रज्ञ वाढविण्याची गरज आहे.- रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटनारेशन दुकानांमध्ये अनेक वेळा कागदपत्रे सादर करूनही नोंदणी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पात्र असूनही धान्य मिळत नाही.- महेश देसाई, रेशन ग्राहकरेशनवर मिळणारे गहू व तांदूळ तसेच मोफत तांदूळ यांचा दर्जा चांगला आहे. कार्डावर जितके धान्य मंजूर आहे, तितके दिले जात आहे.- सोनाली पाटील, रेशन ग्राहक