शहरं
Join us  
Trending Stories
1
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
3
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
4
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
5
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
6
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
7
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
8
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
9
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
10
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
11
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
12
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
13
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
14
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
16
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
17
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
18
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
19
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
20
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पात्र असूनही अनेकजण रेशनपासून वंचित : तांत्रिक कारणांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:41 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले.

कोल्हापूर : रेशनच्या लाभासाठी पात्र असूनही निव्वळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील अनेकजणांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून या लाभार्थ्यांना किमान पुढील महिन्यापासून तरी धान्य पुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार टन धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. धान्याच्या दर्जाबाबत अद्याप तरी कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. असे असले जिल्ह्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे रेशनच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

यामध्ये लाभार्थ्याने कागदपत्रे दुकानदाराकडे सादर करून वर्ष उलटले तरी त्याची आॅनलाईन नोंद झालेली नाही. तसेच रेशन कार्डवरील लाभार्थ्यांची संख्या आणि आॅनलाईन नोंद (उदा. कार्डवरील लाभार्थी संख्या १० असल्यास आॅनलाईनद्वारे ती आठजणांची दिसत आहे) याचा मेळ बसत नाही. यामुळे ग्राहक व रेशन दुकानदार यांच्यात वादाचे प्रकार होत आहेत. पॉस मशीनवरील आधार कार्डाची नोंदणीच अद्याप काही ठिकाणी झाली नसल्याचे दिसत आहे. पुरवठा विभागाने या तांत्रिक त्रुटी दूर करून या महिन्याचे नसले तरी पुढील महिन्यापासून तरी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे. 

तांत्रिक त्रुटीमुळे पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळत नसेल तर या संदर्भात माहिती घेऊन त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न राहील. तसेच या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल.- दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी

पॉस मशीनवरील आधार कार्डच्या नोंदणीच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे अनेक रेशन लाभार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. त्रुटी दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने तंत्रज्ञ वाढविण्याची गरज आहे.- रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटनारेशन दुकानांमध्ये अनेक वेळा कागदपत्रे सादर करूनही नोंदणी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पात्र असूनही धान्य मिळत नाही.- महेश देसाई, रेशन ग्राहकरेशनवर मिळणारे गहू व तांदूळ तसेच मोफत तांदूळ यांचा दर्जा चांगला आहे. कार्डावर जितके धान्य मंजूर आहे, तितके दिले जात आहे.- सोनाली पाटील, रेशन ग्राहक