शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

‘आधार’ असूनही निराधार...

By admin | Updated: February 19, 2015 23:37 IST

ई-आधार कार्ड ठरविले अनधिकृत : ज्येष्ठ नागरिकाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार

प्रवीण देसाई -कोल्हापूर -नागरिकांना खरी ओळख देणाऱ्या आधार कार्डची आता गॅसबरोबर रेशन व्यवस्थेमध्येही सक्ती होऊ लागली आहे. ते मिळविताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ई-आधार कार्ड असूनही ते ग्राह्य धरले जात नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याविरोधात नुकतीच एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे. नेहरूनगर, चिले कॉलनी परिसरातील जयवंत गणपती पेडणेकर या ज्येष्ठ नागरिकाने वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्याप मिळालेले नाही. रेशनसाठी ते आवश्यकच असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी नेटवरून ई-आधार कार्ड काढले आहे. जोपर्यंत आपल्या घरी पोस्टाने हे कार्ड येत नाही, तोपर्यंत ई-कार्डच ग्राह्य धरण्यात येते. सध्या बहुधा हे कार्डच ग्राह्य धरले जात आहे; परंतु पेडणेकर यांना हे कार्ड अधिकृत नसून ते ग्राह्य धरले जात नसल्याचे सांगण्यात आले. या कार्डवर आपले नाव आहे, पत्ता आहे, शिवाय फोटोही आहे; असे असताना हे कार्ड गृहीत न धरणे म्हणजे या वयात अशा ज्येष्ठ नागरिकांची एकप्रकारे केलेली थट्टाच म्हटले तर वावगे ठरणार नाही; परंतु त्यांनी यावर गप्प न बसता आपल्यासारखा अन्याय इतर कुणावरही होऊ नये, यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला आहे. जर नेटवर ई-आधार कार्ड मिळत असेल तर ते नागरिकांना मिळण्यास वेळ का लागतो किंवा त्यांना ते का मिळत नाही? ते येत नसेल तर हातात असलेले ई-कार्ड का ग्राह्य धरले जात नाही? असा त्यांचा सवाल आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ई-आधार कार्ड हे अधिकृत असून, ते ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे ते गृहीत धरलेच पाहिजे. जर कोणी याबाबत शंका उपस्थित करीत असेल तर ते चुकीचे आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.एका बाजूला रेशनचे अनुदान ग्राहकाच्या बॅँक खात्यावर जमा करण्यासाठी आधार कार्डही गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कार्ड काढण्यासाठी कॅँप लावले जात आहेत; परंतु ज्यांचे कार्ड ई-आधारच्या माध्यमातून मिळाले आहे, त्यांचे कार्ड गृहीत धरले जात नाही. त्यांनी काय करायचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सावळ्यागोंधळाचा मानसिक त्रास आणि आर्थिक फटकाही नाहक नागरिकांना बसत आहे. याबाबत काहीतरी ठोस भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.ई-आधारकार्ड ग्राह्य धरण्याची मागणीहे कार्ड चालत नसेल तर ‘आधार’चे दुसरे कार्ड कुठले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्यासारखा अन्याय इतरांवर होऊ नये, तसेच त्यांची फसवणूकही होऊ नये, यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. - जयवंत पेडणेकर, ज्येष्ठ नागरिक