शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ असूनही निराधार...

By admin | Updated: February 19, 2015 23:37 IST

ई-आधार कार्ड ठरविले अनधिकृत : ज्येष्ठ नागरिकाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार

प्रवीण देसाई -कोल्हापूर -नागरिकांना खरी ओळख देणाऱ्या आधार कार्डची आता गॅसबरोबर रेशन व्यवस्थेमध्येही सक्ती होऊ लागली आहे. ते मिळविताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ई-आधार कार्ड असूनही ते ग्राह्य धरले जात नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याविरोधात नुकतीच एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली आहे. नेहरूनगर, चिले कॉलनी परिसरातील जयवंत गणपती पेडणेकर या ज्येष्ठ नागरिकाने वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्याप मिळालेले नाही. रेशनसाठी ते आवश्यकच असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी नेटवरून ई-आधार कार्ड काढले आहे. जोपर्यंत आपल्या घरी पोस्टाने हे कार्ड येत नाही, तोपर्यंत ई-कार्डच ग्राह्य धरण्यात येते. सध्या बहुधा हे कार्डच ग्राह्य धरले जात आहे; परंतु पेडणेकर यांना हे कार्ड अधिकृत नसून ते ग्राह्य धरले जात नसल्याचे सांगण्यात आले. या कार्डवर आपले नाव आहे, पत्ता आहे, शिवाय फोटोही आहे; असे असताना हे कार्ड गृहीत न धरणे म्हणजे या वयात अशा ज्येष्ठ नागरिकांची एकप्रकारे केलेली थट्टाच म्हटले तर वावगे ठरणार नाही; परंतु त्यांनी यावर गप्प न बसता आपल्यासारखा अन्याय इतर कुणावरही होऊ नये, यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला आहे. जर नेटवर ई-आधार कार्ड मिळत असेल तर ते नागरिकांना मिळण्यास वेळ का लागतो किंवा त्यांना ते का मिळत नाही? ते येत नसेल तर हातात असलेले ई-कार्ड का ग्राह्य धरले जात नाही? असा त्यांचा सवाल आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ई-आधार कार्ड हे अधिकृत असून, ते ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे ते गृहीत धरलेच पाहिजे. जर कोणी याबाबत शंका उपस्थित करीत असेल तर ते चुकीचे आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.एका बाजूला रेशनचे अनुदान ग्राहकाच्या बॅँक खात्यावर जमा करण्यासाठी आधार कार्डही गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कार्ड काढण्यासाठी कॅँप लावले जात आहेत; परंतु ज्यांचे कार्ड ई-आधारच्या माध्यमातून मिळाले आहे, त्यांचे कार्ड गृहीत धरले जात नाही. त्यांनी काय करायचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सावळ्यागोंधळाचा मानसिक त्रास आणि आर्थिक फटकाही नाहक नागरिकांना बसत आहे. याबाबत काहीतरी ठोस भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.ई-आधारकार्ड ग्राह्य धरण्याची मागणीहे कार्ड चालत नसेल तर ‘आधार’चे दुसरे कार्ड कुठले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्यासारखा अन्याय इतरांवर होऊ नये, तसेच त्यांची फसवणूकही होऊ नये, यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. - जयवंत पेडणेकर, ज्येष्ठ नागरिक