शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

देवस्थानच्या जमिनी कसणारे हक्कापासून वंचित

By admin | Updated: July 18, 2014 00:27 IST

संतराम पाटील-केनवडेकर : 'कसेल त्याची जमीन' कायद्याच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

म्हाकवे : पिढ्यान्पिढ्या देवस्थानची जमीन कसून त्यावर उपजीविका करणारे राज्यातील शेतकरी कुटुंबे मात्र अद्याप त्या जमिनीच्या मालकी हक्कांपासून वंचितच आहेत. तब्बल ६४ वर्षांपूर्वी देशात ‘कसेल त्याची जमीन’, हा महत्त्वपूर्ण कायदा होऊनही राज्यातील सुमारे दहा लाख शेतकरी या कायद्याच्या अंमलबजावणीकडे आजही डोळे लावून बसले आहेत. राज्यात सुमारे पाच लाख हेक्टर इतकी देवस्थानची जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या मालकी हक्कात न आल्याने अविकसितच राहिली आहे. याबाबत किसान सभेने वारंवार आंदोलने, मोर्चे, मेळावे घेऊन शासन दरबारी लढा दिला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळाच केला आहे.१९५० मध्ये भारत सरकारने कृषक दिन साजरा करीत ‘कसेल त्याची जमीन व कसेल तितका काळ जमीन’ या धोरणाची अंमलबजावणी केली. तसेच या वर्षभरात शेतीविषयक अनेक कायदेही संमत केले. देवस्थानच्या जमिनी कसणारे शेतकरी वगळता अनेक शेतकऱ्यांना या कायद्याचा लाभ झाला. कूळ वहिवाटीचा कायदा देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू न केल्याने या शेतकऱ्यांची अवस्था वेठबिगारीच्याही पलीकडे झाली आहे. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सरकारशी चिवट झुंज दिली जात आहे.मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर रितसर सात-बारा पत्रकी नोंद न झाल्याने या शेतीवर संबंधित शेतकऱ्यांना पाणी योजना करणे, विहीर खुदाई, जमीन विकास, कर्ज मिळणे यांसह जमिनीच्या नैसर्गिक आपत्तीवेळी नुकसानभरपाई मिळणे, पूरग्रस्त काळात खंड माफ होणे, आदी शासकीय मदतही मिळणे कठीण आहे. तसेच ही शेती पारंपरिक पद्घतीनेच केल्याने हे शेतकरी अन्नधान्य निर्मितीमध्ये मागे पडत असून, यामुळे राज्याचे उत्पादनातही घट होत आहे. शासनदरबारी नोंद असलेल्या १७ हजार १६८ देवस्थानांकडे सुमारे ५ लाख ५८ हजार ४३७ एकर जमीन आहे, तर नोंद न झालेली गावस्की देवस्थान, खासगी देवस्थान, ट्रस्ट अनुषंगिक देवस्थान समितीच्या लाखो एकर जमिनी आहेत. या सर्व जमिनींवर दहा लाखांहून अधिक शेतकरी (कुळे) आपला उदरनिर्वाह करतात.किसान सभेने दिलेल्या लढ्यामुळे पश्चिम बंगालमधील १३ लाख हेक्टर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची केली. यामुळे हे राज्य भात उत्पादनात देशात अव्वल दर्जाचे ठरले आहे. (वार्ताहर)कोल्हापुरात उद्या राज्यव्यापी मेळावादेवस्थानच्या जमिनी मालकीच्या व्हाव्यात यासाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्रातीलच शेतकरी लढा देत होते. त्यामुळे त्याला मर्यादा येत होत्या; परंतु आता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी या लढ्यात उडी घेतल्याने लढ्याची व्यापकता वाढली आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी (दि. १९) निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र देवस्थान जमीनधारक समितीचे अध्यक्ष कॉ. संतराम पाटील-केनवडेकर यांनी दिली.