शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

जिल्ह्यातील १२ हजार कोटींच्या ठेवींना मिळणार विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचे आणि ९० दिवसांच्या आत ठेवी परत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारने पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचे आणि ९० दिवसांच्या आत ठेवी परत करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ४६ नागरी बँकातील १२ हजार कोटींच्या ठेवी सुरक्षित झाल्या आहेत. बँका आणि ठेवीदारही येथून पुढे निर्धास्त राहणार आहेत. शिवाय सहकारी बँकांवरील ठेवीदारांचा विश्वासही वाढीस लागेल.

सध्या दोन लाखांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण मिळत होते; पण समजा बँक डबघाईला आणि निर्बंध आले तर ठेवी परत मिळण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागत होता. ठेवीदारांना स्वत:च्याच पैशासाठी बँकाचे हेलपाटे मारावे लागत होते; पण आता हे संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात नागरी सहकारी बँकाचे चांगले जाळे आहे. राष्ट्रीय बँकांनी ऐनवेळेला हात वर करीत असल्याने अडीअडचणीला या नागरी बँकाच नागरिकांच्या मदतीला धावून येतात. देशाचा विचार करता एकूण बँकिग क्षेत्रात नागरी बँकांचे ठेवीतील योगदान अर्धा ते एक टक्का इतके अल्प आहे. याचे कारण या नागरी बँकाचे जाळे फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्येच आहे, देशभर नाही. त्यामुळे या बँकाच्या व्यवहारावर मर्यादा आहेत, तरीदेखील या तीन राज्यांत कर्ज, ठेवीच्या बाबतीत नागरी बँका राष्ट्रीय, बँकापेक्षा सरस आहेत. जिल्ह्यात ४६ नागरी बँका कार्यरत आहेत. यांच्याकडे पाच लाखांपर्यंतच्या ठेवींची संख्या तब्बल १२ हजार कोटी इतकी आहे. नागरी बँकांकडे मोठे ठेवीदार अत्यल्प असतात. पाच लाखांपर्यंतची ठेवीदारांची संख्या जास्त असते.

चौकट -

जिल्ह्यात राष्ट्रीय बँकाची सेवा समाधानकारक नाही, सहकारी बँकावर विश्वास नाही अशी कांहीशी परिस्थिती आहे. भुदरगड पतसंस्था, मराठा, बलभीम, शाहू बँक यासारख्या वैभवशाली बँका अवसायनात निघाल्यानंतर ठेवीदारांच्या नुकसानीची अजूनही मोजदाद होऊ शकत नाही. हा अनुभव गाठीशी असल्याने अजूनही ठेवीदार बिचकतच व्यवहार करताना दिसतो. एखाद्या बँकेच्या बाबतीत जरा कांही खुट्ट झाले तर ठेवीदार कसे बँकेच्या दारात ठेवी काढण्यासाठी रांगा लावतात हे गडहिंग्लज, युथ यासारख्या बँकांनी अनुभव घेतला आहे.

चौकट -

वेगवेगळ्या बँकामध्ये ठेवीचा पर्याय

बऱ्याच जणांचे त्यातही ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य हे ठेवीच्या व्याजावर चालते; पण एकाच बँकेत मोठी रक्कम ठेवणे हे तसे धोक्याचे असल्याने विमा संरक्षित असलेली पाच लाखांपर्यंतची रक्कम अन्य बँकांमध्ये विभागून ठेवता येते. त्यामुळे नागरिकांची धास्तीही कमी होणार असून, पैसेही अडकून पडणार नाहीत.

प्रतिक्रिया -

जिल्ह्याच्या अर्थकारणात नागरी बँकांचे योगदान मोठे आहे. हा विमा संरक्षणाचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, ठेवीदाराबरोबरच बँकांचेही भवितव्य सुरक्षित केले आहे. ठेवीदारांची संख्या वाढून बँकेच्या प्रगतीत भरच पडणार आहे.

निपुण कोरे,

अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन कोल्हापूर

प्रतिक्रिया -

नागरी बँकाकडून सध्या दोन लाखांपर्यंत ठेवीसाठी विमा कंपन्यांकडे प्रीमियम भरला जात आहे. आता त्याचा विस्तार पाच लाखांपर्यंत झाल्याने विमा रक्कम वाढणार असली तरी डोक्यावरची जोखीम कमी असल्याने बँकाच्या विस्ताराकडे जास्त लक्ष देता येणार आहे.

अनिल नागराळे,

मुख्य कार्यकारी अधिकारी नागरी बँक असोसिएशन