शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा डंख घातक, लागलीच चाचणी करून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली ...

कोल्हापूर : अतिवृष्टी, महापूर यामुळे शहरात सर्वत्र चिखल साचून दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून डबकी तयार झाली आहेत. डासाचे साम्राज्य वाढून डेंग्यूचा धोका वाढला आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने अंगात साधा ताप जरी असला तरी तो अंगावर काढणे, दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

गेल्या दीड वर्षापासून शहरवासीयांचे आरोग्य बिघडलेले आहे. कोरोनाने नागरिकांना हैराण केले. त्याचा मुकाबला करता करता नाकीदम आला असताना आता परत अतिवृष्टी, महापुराने आजार आणले आहेत.गॅस्ट्रो, पोटाचे विकास, डेंग्यू, चिकुनगुनिया, यासारखे गंभीर आजारही सतावत आहेत. कोल्हापूर शहरात चिकुनगुनिया, डेंग्यूचे रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडे असे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने रुग्णांचा आकडा मोठा आहे.

सर्वेक्षण थांबले-

कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच अतिवृष्टी व महापूर आला. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवस महापालिका यंत्रणात त्यात व्यस्त होती. पूर ओसरल्यानंतर आराेग्य सविधा देण्यात यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाचे सर्वेक्षणच थांबले आहे. त्यामुळे शहरात किती रुग्ण आहेत याचा नेमका अंदाज नाही.

सांधेदुखी, ताप व थंडी वाजून येते-

डेंग्यू व चिकुनगुनियामुळे मनगट, घोटा, गुडगा, खांदे अशा सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. ताप येतो. थंडी वाजून येते. तांबड्या व पांढऱ्या पेशी कमी होतात. प्लेटलेट कमी झाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे उचित ठरते.

- डासांपासून सावध रहा -

अतिवृष्टीमुळे घराच्या परिसरात चिखल, सांडपाणी साचलेले आहे. टायर्स, नारळाची बेल्टी यामध्ये पाणी साचून पाणी साचत आहे. परिसर अद्याप स्वच्छ व कोरडा झालेला नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात आळी घालतात. त्यामुळे घरातील फ्रीज, कुंड्या, प्लेट यातील साचणाऱ्या पाणीची विल्हेवाट लावली पाहिजे. डास होणार नाहीत, चावणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे.

- कोणती चाचणी करून घ्यावी-

डेग्यू व चिकुनगुनिया झाला आहे का हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने सीबीसी, युरिन, ब्लड फॉर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया या चाचणी करुन घेणे हिताचे ठरते. काही अपवादात्मक परिस्थितीत अँटिजेन टेस्टसुध्दा करावी. कारण कोरोना संसर्गसुध्दा झालेला असू शकतो.

- ही फळे भरपूर खा -

शरीरातील प्लेटलेटस् कमी झाली असल्याचे तपासणी अंती लक्षात येताच वैद्यकीय उपचाराबरोबरच किवी, ड्रॅगन, पपई, डाळिंब अशी फळे भरपूर खाल्ली पाहिजेत. प्लेटलेटस् वाढण्यात ही फळे महत्त्वाची भूमिका बजावतात.

डॉक्टर कोट -

डेग्यू व चिकुनगुनियाची लक्षणे असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला डोळा, नाक, कान, तोंड अशा जिथे भोक आहे त्याठिकाणाहून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याआधी योग्यवेळी योग्य तपासण्या करून घेणे रुग्णाच्या हिताचे ठरते.

डॉ. विलास महाजन

माजी अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असो.