शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

कोल्हापुरात ‘डेंग्यू’चा विळखा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:02 IST

कोल्हापूर : शहरातील जवाहरनगर, नेहरूनगर, कदमवाडी, जाधववाडी, शहाजी वसाहत, आदी भागांत घरोघरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; पण शहरातील अनेक खासगी रुग्णालये डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांनी भरली असताना त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करून फक्त काही खासगी ...

कोल्हापूर : शहरातील जवाहरनगर, नेहरूनगर, कदमवाडी, जाधववाडी, शहाजी वसाहत, आदी भागांत घरोघरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; पण शहरातील अनेक खासगी रुग्णालये डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांनी भरली असताना त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करून फक्त काही खासगी रुग्णालयांतून येणाºया ‘डेंग्यू’ रुग्णांच्या तोकड्या आकडेवारीवर समाधान मानत आहे. दिवसभरात शहराच्या विविध भागांत गुुरुवारी डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले सुमारे ४९ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी सर्व्हेदरम्यान फक्त २३ रुग्ण आढळले आहेत.महापालिका सभेत सदस्यांनी शहरातील डेंग्यू आजारावरून प्रशासनावर टीकेची झोड उठविल्यानंतर बुधवार (दि. २०) पासून महापालिका यंत्रणा कामाला लागली असून, सुमारे ११ पथकांद्वारे शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेद्वारे सर्वेक्षण व प्रबोधनाचे कार्य सुरू केले आहे. जवाहरनगर, नेहरूनगर, कदमवाडी, जाधववाडी, आदी भागांत घरोघरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळू लागल्याने ते सर्वजण शहरातील अनेक खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत; पण ती नेमकी रुग्णसंख्या मात्र महापालिकेच्या यंत्रणेपर्यंत पोहोचत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे कितीही आवाहन करूनही खासगी रुग्णालयाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे अगर तापाच्या रुग्णांची तोकडीसंख्या महापालिकेपर्यंत पोहोचत आहे.डासांच्या अळ्या आढळल्यामहापालिकेने गुरुवारी कनाननगर (२० कुटुंबांकडे अळ्यायुक्त पाणी), जुना बुधवार पेठ (३० कुटुंबे), महाडिक माळ (३३ कुटुंबे), जवाहरनगर (०८ कुटुंबे), देवकर पाणंद (५२ कुटुंबे), शहाजी वसाहत ( ६७ कुटुंबे), इत्यादी ठिकाणी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी कुटुंब कल्याण केंद्र (दवाखाना), इत्यादी विभागांनी संयुक्तपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबविली. त्यामध्ये २९७४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी २१० कुटुंबांकडील साचलेल्या पाण्यात डास व अळ्या आढळून आल्या; तर खरमाती उठाव केलेली २६ ठिकाणे, तसेच ४९ ठिकाणांची पाण्याची डबकी बुजविण्यात आली.