शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

By admin | Updated: January 29, 2016 23:51 IST

यंत्रमाग कामगार संघटना : किमान वेतनाची मागणी

इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांसाठी राज्य शासनाने जारी केलेल्या किमान वेतनाच्या अध्यादेशाला एक वर्ष होऊनही अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शुक्रवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तर लाल बावटा सायझिंंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.२९ जानेवारी २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य शासनाकडून सुधारित किमान वेतन जाहीर करण्यात आले. त्याला मालक प्रतिनिधी संघटनांनी विरोध केला असला तरी न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती दिलेली नाही. असे असताना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. सुधारित किमान वेतन जाहीर झाल्यानंतरही त्यापेक्षा कमी वेतन दिलेल्या मालकांच्या विरोधात फरकाचे दावे दाखल केले आहेत. त्याची अद्याप सुनावणी सुरू करण्यात आलेली नाही, अशा मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी शुक्रवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करीत शासनाचा निषेध केला. आंदोलनात दत्ता माने, शामराव कुलकर्णी, राजेंद्र निकम, परशराम आगम, आनंदा गुरव, सुनील बारवाडे, शिवानंद पाटील, विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.तसेच लाल बावटा सायझ्ािंंग- वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी, मारुती जाधव, सूर्यकांत शेंडे, दशरथ जाधव, महादेव बरुर, आदींसह कामगार सहभागी झाले होते. (वार्ताहर)मुंबई येथे बैठकीत ‘आयटक’चा इशाराइचलकरंजी : यंत्रमाग कामगारांचे किमान वेतन, कल्याणकारी मंडळ, आदींसह सर्वच प्रश्नांकडे सध्याचे भाजप सरकार दुर्लक्ष करीत आहे. तरी आयटक कामगार संघटनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आयटक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव शाम काळे (नागपूर) होते.राज्यातील यंत्रमाग क्षेत्रामधील आयटक पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथील रुपेश गुप्ता भवन येथे झाली. यावेळी सर्वच वक्त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यंत्रमाग क्षेत्रातील कामगारांचा मेळावा आयोजित करून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घ्यावा, असे सूचित केले आणि त्याप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीमध्ये हणमंत लोहार, अशोक गोपलकर, विजय कांबळे, मक्सूद अन्सारी, फैय्याज अन्सारी, आदींनी आपले विचार मांडले.