शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

सावकारकीमुळे कुटुंबे उद्ध्वस्त

By admin | Updated: March 10, 2016 01:07 IST

वसुलीसाठी टोकाची भूमिका : कर्जदारांमध्ये दहशत; पोलिसांनी प्रवृत्ती ठेचण्याची गरज

एकनाथ पाटील- कोल्हापूर -कौटुंबिक अडचणी दूर करण्यासाठी खासगी सावकारांकडून लोक व्याजाने कर्ज घेत असतात; परंतु हे सावकार मनमानीपणे व्याज आकारून गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त करत आहेत. महिला दिनानिमित्त स्त्रियांचा सर्वत्र सन्मान होत असताना वडणगे (ता. करवीर) येथे व्याजाच्या वसुलीसाठी महिलेचे अपहरण करून तिला अमानुषपणे मारहाण करून डांबून ठेवणाऱ्या खासगी सावकाराचे कृत्य कोल्हापूरच्या संस्कृतीला लज्जास्पद आहे. खासगी सावकारांची दहशत नागरिकांच्या जिव्हारी आली आहे. पोलीस प्रशासनाने अशा सावकारांना वेळीच ठेचणे आज काळाची गरज बनली आहे. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. महिलादिना दिवशीच महिलेचे अपहरण करून तिला डांबून ठेवण्याचे घृणास्पद कृत्य खासगी सावकारांनी केले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला आहे. सावकारकीचा फास संपूर्ण जिल्ह्याभोवती आवळत आहे. त्याला वेळीच ठेचण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. खासगी सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. सुरुवातीस कर्ज परत करण्यासाठी तगादा लावला जात नाही; परंतु त्यानंतर त्यांना व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जाते. गरीब लोकांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. दरमहा १५ ते २५ टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देताना कर्जदार पुन्हा कर्जाच्या खाईत सापडतो. ही वसुली करण्यासाठी सावकारांनी काही गुंड पोसले आहेत. त्यांच्याकडून वेळप्रसंगी दमदाटी व मारहाणही केली जाते. त्यामुळे या सावकारांविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नाहीत. जाचक अटींमुळे सावकारी पर्यायबँका किंवा पतसंस्थेतून कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रे, जामिनाची जुळवाजुळव करताना नागरिकांची दमछाक होते. त्यामुळे आर्थिक अडचण सोडविण्यासाठी अखेरचा सोपा मार्ग म्हणून लोक सावकारांकडून कर्ज घेतात. अशावेळी ते व्याजाचा विचार करीत नाहीत. सावकार कर्जदाराकडून दोन कोरे धनादेश घेतले जातात. स्टॅम्प करून स्थावर मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतली जातात. हा व्यवहार नियमबाह्य असतो. सावकारी मोडीत काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. नागरिकांनीही निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे, त्यांना न्याय दिला जाईल. - प्रदीप देशपांडे, पोलीस अधीक्षक बिहारी गुंडांकडून वसुली खासगी सावकारीमध्ये काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा आहे. पेठेतील एका पुढाऱ्याने सानेगुरुजी वसाहत, रिंगरोड येथील बनावट दस्ताद्वारे करोडो रुपयांच्या जमिनी हडप केल्या आहेत. त्याच्या विरोधात पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने काही धाडसी लोकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. कुळे बाहेर काढणे, व्याजाने पैसे फिरविणे, वसुली करणे यासाठी ते बिहारी गुंडांचा वापर करतात. या गुंडांचे वास्तव शिंगणापूर परिसरात असल्याची चर्चा आहे.