शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मतदान यंत्रांच्याद्वारे लोकशाहीचीच थट्टा!

By admin | Updated: July 23, 2014 23:01 IST

वामन मेश्राम : निवडणूक आयोगावर टीका

सांगली : सत्तेचा दुरुपयोग आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळे करून काँग्रेस आणि भाजप निवडणुका जिंकत आहे़ मतदारांना मत कुणाला दिले ते कळाले पाहिजे़ वोटिंग मशीनमध्ये बदल करून मतदारांना त्याची पावती देण्याची व्यवस्था करूनच विधानसभा निवडणुकीत त्याचा वापर करावा़ अन्यथा भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन छेडतील, असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिला़इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये त्रुटी असल्याच्या प्रश्नावर मतदारांमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जनजागरण अभियान राबविले जात आहे़ सांगली येथे आज (बुधवारी) झालेल्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मेश्राम बोलत होते़ ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांना बदल्यांच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून मतदान यंत्रांमध्ये बदल करून घेतला जात आहे़ निवडणूक आयोग आणि अधिकारीही लोकशाहीची थट्टा करीत असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील मतदान पध्दतीमध्ये बदल केला पाहिजे़ मतदाराला मत कुणाला दिले ते कळले पाहिजे़ तसा बदल मशीनमध्ये करून घ्यावा़ अन्यथा आम्ही देशभर तीव्र आंदोलन सुरू करू, असा इशाराही त्यांनी दिला़बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर म्हणाले की, घटनेची कडक अंमलबजावणी केल्यास सर्वांचेच भले होईल.यावेळी संत गाडगेबाबांचे नातू हरिनारायण जानोरकर, तानाजी मालुसरेंच्या वंशज कवयित्री शीतल मालुसरे, विष्णू खंडागळे, मौलाना याकूब, याहब कासमी, नगरसेविका शेवंता वाघमारे, भारत मुक्तीचे जिल्हाध्यक्ष हाजी दस्तगीर मलीदवाले उपस्थित होते़ प्रास्ताविक सचिन आवळे यांनी केले़ (प्रतिनिधी)