शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरील कोरोनाचे संदेश बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या जनजागरणासाठी सुरू केलेली मोबाईलवरील संदेश मोहीम आता थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात ...

कोल्हापूर : कोरोनाच्या जनजागरणासाठी सुरू केलेली मोबाईलवरील संदेश मोहीम आता थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी येत असल्याने फोन लावताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हे संदेश बंद करण्याची गरज व्यक्त होत आहे.

भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जनजागरण करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही संदेश मोेहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात कोरोनाबाबत फारशी माहिती नसल्याने या संदेशांचा चांगला फायदा झाला. त्यातील गांभीर्यही नागरिकांच्या लक्षात आले. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी आली आहे. नवे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे हे संदेश बंद करण्याची गरज व्यक्त होत आहे.

चौकट

आपत्कालीन परिस्थितीत संदेशांची अडचण

सध्या कोणताही मोबाईल लावल्यानंतर कोरोनाचा हा संदेश ऐकावा लागतो. तेव्हा पलीकडच्या माणसाला फोन लागला आहे की नाही हेदेखील फोन करणाऱ्याला समजत नाही. अपघात, डॉक्टरांची गरज असते तेव्हा, एखादी दुर्घटना घडताना अशा पद्धतीने वेळ जाणे धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच हे कोरोना संदेश बंद करण्याची मागणी होत आहे.

कोट

तातडीने फोन लावताना कोरोना संदेश अडचणीचा ठरत आहे. आता कोरोनाविषयक जनजागरण झाले आहे. सूचना पाठ झाल्या आहेत. नागरिक शक्य तेवढी काळजी घेत आहेत; परंतु अतितातडीच्या वेळी फोन लागण्यापेक्षा संदेश ऐकण्यात जास्त वेळ जात आहे. त्यामुळे संदेश बंद झाल्यास नागरिकांच्या सोयीचे होईल.

- दीपक गायकवाड