शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीलाही ‘डिमांड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘डिमांड’ वाढला आहे. १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीचे अर्ज ...

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘डिमांड’ वाढला आहे. १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीचे अर्ज आले आहेत. यामध्ये काही प्रभागांत तीन ते चार इच्छुक आहेत. यामुळे उमेदवारी देणे नेत्यांना डोकेदुखीचे ठरणार आहे. शिवसेनेमधूनही उमेदवारीसाठी काही प्रभागांत जोरदार चढाओढ आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून, छुपी रणनीती आखण्यामध्ये ते व्यस्त आहेत. ऐनवेळी ते ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पत्ते खोलण्यास सुरू केली आहे. पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे, तसेच गेल्या दहा वर्षांत महापालिकेवर सत्ता असल्यामुळे बहुतांशी इच्छुकांची काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून उमेदवारीसाठी धडपड सुरू आहे.

राष्ट्रवादीने पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्याकडे अर्ज दाखल होत आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडे १०० पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यामध्ये यादवनगर प्रभाग क्रमांक ३५ मधून सर्वाधिक अर्ज आले आहेत. काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार नसल्याचे समजल्याने काहींनी राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे.

भाजप, ताराराणी आघाडीकडूनही निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्यात सत्ता नसली तरी आघाडी आणि नेत्यांशी कट्टर असणाऱ्यांनी भाजप, ताराराणी आघाडीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये काही विद्यमान नगरसेवक आहेत.

शिवसेनेचा महापौर होण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चंग बांधला आहे. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ते राहत असलेल्या प्रभागावर त्यांचे विशेष लक्ष असून येथील प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौकट

राष्ट्रवादीचे टार्गेट ५० जागा

राष्ट्रवादीचे गत निवडणुकीमध्ये १४ प्रभागातीलच उमेदवार विजयी झाले. याची सल नेत्यांना आजही आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. तीन ते चार वेळ कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. सर्व ८१ प्रभागांत उमेदवार देऊन ५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट आहे.