शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीलाही ‘डिमांड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘डिमांड’ वाढला आहे. १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीचे अर्ज ...

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘डिमांड’ वाढला आहे. १०० पेक्षा जास्त इच्छुकांकडून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीचे अर्ज आले आहेत. यामध्ये काही प्रभागांत तीन ते चार इच्छुक आहेत. यामुळे उमेदवारी देणे नेत्यांना डोकेदुखीचे ठरणार आहे. शिवसेनेमधूनही उमेदवारीसाठी काही प्रभागांत जोरदार चढाओढ आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून, छुपी रणनीती आखण्यामध्ये ते व्यस्त आहेत. ऐनवेळी ते ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पत्ते खोलण्यास सुरू केली आहे. पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे, तसेच गेल्या दहा वर्षांत महापालिकेवर सत्ता असल्यामुळे बहुतांशी इच्छुकांची काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून उमेदवारीसाठी धडपड सुरू आहे.

राष्ट्रवादीने पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्याकडे अर्ज दाखल होत आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडे १०० पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यामध्ये यादवनगर प्रभाग क्रमांक ३५ मधून सर्वाधिक अर्ज आले आहेत. काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार नसल्याचे समजल्याने काहींनी राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे.

भाजप, ताराराणी आघाडीकडूनही निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्यात सत्ता नसली तरी आघाडी आणि नेत्यांशी कट्टर असणाऱ्यांनी भाजप, ताराराणी आघाडीतूनच निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये काही विद्यमान नगरसेवक आहेत.

शिवसेनेचा महापौर होण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चंग बांधला आहे. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ते राहत असलेल्या प्रभागावर त्यांचे विशेष लक्ष असून येथील प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चौकट

राष्ट्रवादीचे टार्गेट ५० जागा

राष्ट्रवादीचे गत निवडणुकीमध्ये १४ प्रभागातीलच उमेदवार विजयी झाले. याची सल नेत्यांना आजही आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. तीन ते चार वेळ कोअर कमिटीची बैठक घेतली आहे. सर्व ८१ प्रभागांत उमेदवार देऊन ५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे टार्गेट आहे.