शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

'मनपा बरखास्तीची मागणी हास्यास्पद

By admin | Updated: February 11, 2015 00:29 IST

तज्ज्ञांचे मत : एका सदस्याच्या गैरकृत्याबद्दल बरखास्तीची तरतूदच नाही

विश्वास पाटील - कोल्हापूर -महापौर तृप्ती माळवी या लाच प्रकरणात अडकल्या म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगून महापालिकाच बरखास्त करण्याची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मागणीच मुळात हास्यास्पद असून, ती कायद्याला धरून नसल्याची माहिती राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी पाटील यांनी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून महापालिका बरखास्तीची मागणी करणार असल्याचे विधान केले होते. महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत नोव्हेंबर २०१५ पर्यंत आहे. त्यामुळे आठ महिन्यांत निवडणुका होणार आहेत. त्या डोळ््यांसमोर ठेवूनच पालकमंत्र्यांनी ही राजकीय मागणी केल्याचे चित्र दिसत आहे.महापालिकांचा कारभार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये चालतो. त्याच कायद्याचे नाव आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ असे झाले आहे. या कायद्याच्या ‘कलम ४५२’ मध्ये त्यासंबंधीची तरतूद आहे. त्यामध्ये महापालिका बरखास्तीची प्रमुख चार कारणे कारणे दिली आहेत. ती अशी : १) महापालिका नेमून दिलेली कामे करण्यास अपयशी ठरत असल्यास २) महापालिकेत मोठ्या प्रमाणावर अफरातफर सुरू आहे व त्यामध्ये लोकप्रतिनिधी गुंतले आहेत. ३) कायद्याने नेमून दिलेली कर्तव्ये करण्यास संस्था अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यास ४) सत्तेचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार व प्रशासकीय गोंधळ होऊन लोकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे स्पष्ट झाल्यास.परंतु, हे करतानाही ती कशी बरखास्त करावी, यासंबंधीची कायदेशीर तरतूद आहे. महापालिकेला त्यासंबंधी म्हणणे मांडण्यास पुरेशी संधी देणे आवश्यक आहे. ती देताना राज्य शासन महापालिकेस ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून महापालिका का बरखास्त करू नये, याचे स्पष्टीकरण मागवणे बंधनकारक असते. राज्यघटनेच्या २४३ (झेड) एफ या कलमान्वये हे अधिकार राज्य शासनास प्राप्त झाले आहेत. बरखास्तीची आॅर्डर राजपत्रात प्रसिद्ध केल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होते. ही सगळी प्रक्रिया राबविण्यासाठी तेवढा वेळही आता शासनाकडे नाही. कारण आठ महिन्यांत निवडणुकाच होत आहेत. कोल्हापूर महापालिकेत महापौरांनी लाच घेतल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यामध्ये त्यांच्यावर हा गुन्हा अजून शाबूत झालेला नाही. महापौरांनाच लाच घेताना पकडल्यामुळे कोल्हापूरची अब्रू गेली हे खरेच आहे; परंतु ती या प्रकरणाची नैतिक बाजू आहे. दुसरे असे की, महापालिकेत ७७ लोकनियुक्त व ५ स्वीकृत असे ८२ नगरसेवक आहेत. त्यातील एकाने लाच घेतली म्हणून उर्वरित ८१ सदस्यांच्या हक्कांवर कायद्याने गदा आणता येत नाही.व्यक्तीच्या चुकीच्या व्यवहारांचा दोष घटनात्मक पाया असलेल्या संस्थेला देता येत नाही. कायद्यालाच ते मान्य नाही. राज्यात भ्रष्टाचाराचे प्रकरण झाले म्हणून महापालिका बरखास्त झाल्याचे आतापर्यंत एकही उदाहरण नाही, असे या विषयाशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे. असा निर्णय झाल्यास त्यास न्यायालयात कुणी आव्हान दिल्यास ते अडचणीचे ठरू शकते.