शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ करणार ३३००ची मागणी-जयसिंगपूरला आज ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:17 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे.

ठळक मुद्दे या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला.यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे.गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची पहिली उचल टनास ३३०० रुपये असण्याची शक्यता आहे. आज, शनिवारी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत पहिल्या उचलीचा बार फुटणार आहे. मागणी कितीही असली तरी खासदार राजू शेट्टी तडजोड कितीवर करतात आणि एफआरपीपेक्षा किती रक्कम जास्त द्यावी लागणार, ती एफआरपीसोबत की काही मुदतीनंतर द्यावी लागणार हाच कळीचा मुद्दा आहे. यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या आधीही कारखानदारांसमवेत बैठक घेऊन चर्चा करायची तयारी दर्शवली होती; परंतु संघटना व कारखानदार यांना एकत्र आणण्यास कुणीच पुढाकार घेतला नाही. सरकार म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गतवर्षी ऊसदरात पुढाकार घेतला होता; परंतु यंदा शेट्टी भाजपावर देशभर फिरून टीकेचा भडिमार करीत असल्याने पालकमंत्र्यांनी या प्रश्नात अजून तरी लक्ष घातलेले नाही.

उलट पहिली उचल एफआरपीनुसार व अंतिम दर ७०:३० च्या फॉर्म्युल्यानुसार कारखाने देत असताना आंदोलनाची गरज नाही, असे सांगून टाकले आहे. त्यामुळे दोन्ही घटकांत चर्चाच होऊ शकलेली नाही. परिणामी, पहिल्या उचलीचा तिढा सुटल्यशिवाय स्वाभिमानी धुराडी पेटवू देणार नाही. त्यामुळे हंगाम सुरळीत व्हायला पहिला आठवडा जाणार आहे.गतवर्षी स्वाभिमानीने पहिली उचल ३२०० रुपये मागितली व एफआरपी आणि त्यासोबतच १७५ रुपये जादा देण्यावर तडजोड झाली. या हंगामातील अंतिम दर हुतात्मा कारखान्याने ३३५० दिला. याचा अर्थ स्वाभिमानीने मागणी केलेल्या उचलीपेक्षा हुतात्माने टनांस १५० रुपये जास्त दिले आहेत. यंदा बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये क्विंटल आहे. गतवर्षीच्या तुलनेत दर चांगला असल्याने पहिली उचल वाढवून मागण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने टनास ३५०० रुपयांची मागणी केली आहे. त्यांची मागणी प्रतिवर्षीच सर्वांत जास्त असते.

मागच्या हंगामातील अंतिम दर अजून निश्चित झालेले नाहीत. काही कारखान्यांनी साखरेचा दर कमी दाखविल्याने ऊसदर नियंत्रण समितीच्या २० सप्टेंबरला झालेल्या बैठकीत संघटनेच्या नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला होता. त्यावर साखर आयुक्त कार्यालयानेच साखर दराबाबत खात्री करावी, असे ठरल्याने त्या बैठकीत कारखान्यांच्या अंतिम दराचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले नव्हते. ही बैठक हंगाम संपण्यापूर्वी घ्यावी असे ठरले होते; परंतु ती अजून झाली नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी समितीच्या अध्यक्षांना पत्र देऊन तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.दृष्टिक्षेपात हंगामसन २०१७-१८ या गाळप हंगामात अंदाजे नऊ लाख हेक्टर उसाची लागवड असून, ७२२ लाख टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे, तर ७३.४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या गाळपाच्या तुलनेत सन २०१७-१८ मध्ये ९४ टक्के वाढ अपेक्षित आहे. या हंगामात राज्यात १७० कारखाने सुरू होणार असल्याची माहिती मंत्री समितीने दिली आहे. यंदा परतीचा पाऊस सगळीकडे आॅक्टोबर अखेरपर्यंत झाल्यामुळे ऊस पिकास तो पोषक ठरला आहे. त्यामुळेही उत्पादन वाढणार आहे.साखरेचे संभाव्य मूल्यांकन असे :बाजारातील साखरेचा क्विंटलचा दर रु. ३५००त्याच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध : २९७५त्यातून एफआरपीसह विविध कर्जांच्या व्याजापोटी ५०० रुपये कपातकारखान्यांना अनुषंगिक कामासाठी टनास २५० रुपये देणारनिव्वळ उसासाठी उपलब्ध : २२२५ रुपयेकोल्हापूर जिल्ह्णातील सरासरी एफआरपी : २८०० रुपयेज्या कारखान्यांचे कर्ज कमी आहे त्यांच्या व्याजापोटी ३०० रुपये गेल्यास ऊस बिलासाठी २०० रुपये जादा उपलब्धही रक्कम दहा उताºयाची आहे. हंगाम पुढे जाईल तसा उतारा वाढेल तेव्हा ही रक्कम वाढू शकते.