शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

मलकापूर कार्यालयात ‘बीएसएनएल’ सेवेचा बोजवारा

By admin | Updated: September 23, 2014 23:52 IST

तक्रार घेण्यासाठीही अधिकारी नाहीरिकाम्या खुर्च्या

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. मोबाईलना रेंज मिळत नाही, तर दूरध्वनीला सुरळीत सेवा मिळत नाही. कार्यालयातील खुर्च्या रिकाम्याच असल्याने तक्रार करण्यासाठी अधिकारीही उपलब्ध नाही. हे कार्यालय कशासाठी व कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला असून बीएसएनएलच्या सेवेला कंटाळून ग्राहक इतर खासगी कंपन्यांकडे वळू लागला आहे. विशाळगड, शित्तूरवारुण, उदगिरी, येळवणजुगाई, आदी परिसरातील गावांतील नागरिकांनी बीएसएनएलला रामराम ठोकला आहे.शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएलचे १७ एक्स्चेंज अंतर्गत सहा हजारांवर दूरध्वनी आहेत. तालुक्यातील बहुतांश लोक मुंबई येथे तसेच सैन्यदलात आहेत. मात्र, बीएसएनएल सेवा ग्राहकांना वेळेत मिळत नाही. याकडे येथील अधिकारी व कामगार ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मलकापूर येथे तालुका अंतर्गत एक्स्चेंज आहे. मोबाईल ही सेवा अत्यावश्यक सेवा बनली आहे. प्रत्येक नागरिकाला फोनसेवा, फॅक्स, इंटरनेट, आदी सुविधा गरजेच्या बनल्या आहेत. मात्र बीएसएनएल सेवेमुळे नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. तक्रार करूनदेखील न्याय मिळत नाही. विरळे परिसरात रेंजचा पत्ताच नाही. मात्र, सर्वत्र दूरध्वनी सेवेचे टॉवर दिमाखात उभे आहेत. उदगिरी गावातील नवीन टॉवर गेली पाच वर्षे बंद आहे. गावा-गावांतील नागरिकांनी आपले घरगुती फोन संबंधित कार्यालयाकडे जमा केले आहेत. हे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत.मलकापूर मंडल कार्यालयात गेली तीन महिने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असताना देखील वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत. नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. येथे असणारे कर्मचारीदेखील नागरिकांना नीट उत्तरे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारींचा ओघयेथील उपमंडल अधिकारी यांची बदली कोल्हापूरला झाल्याने हे पद रिक्त आहे, तर इतर कर्मचारी यांच्या बदल्या झाल्याने सर्व पदे रिक्त आहेत. सध्या या कार्यालयाकडे एक अधिकारी, एक लिपिक, शिपाई व एक टेक्निशियन उपलब्ध आहे. अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे या कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे. ४मलकापूर येथील एका खासगी लाईनमनवर या कार्यालयाचा कारभार सुरू आहे, तर ग्रामीण भागात ही सेवा पूर्णत: बंद आहे. दररोज तालुक्यातून नागरिकांचा तक्रारींचा ओघ सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी जाणूनबुजून येथे बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी पाठवीत नाहीत. हे कार्यालय कोल्हापूर येथे स्थालांतरित करण्याचा अधिकाऱ्यांचा घाट असल्याची चर्चा सुरू आहे.