शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर कार्यालयात ‘बीएसएनएल’ सेवेचा बोजवारा

By admin | Updated: September 23, 2014 23:52 IST

तक्रार घेण्यासाठीही अधिकारी नाहीरिकाम्या खुर्च्या

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएल सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. मोबाईलना रेंज मिळत नाही, तर दूरध्वनीला सुरळीत सेवा मिळत नाही. कार्यालयातील खुर्च्या रिकाम्याच असल्याने तक्रार करण्यासाठी अधिकारीही उपलब्ध नाही. हे कार्यालय कशासाठी व कोणासाठी सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला असून बीएसएनएलच्या सेवेला कंटाळून ग्राहक इतर खासगी कंपन्यांकडे वळू लागला आहे. विशाळगड, शित्तूरवारुण, उदगिरी, येळवणजुगाई, आदी परिसरातील गावांतील नागरिकांनी बीएसएनएलला रामराम ठोकला आहे.शाहूवाडी तालुक्यात बीएसएनएलचे १७ एक्स्चेंज अंतर्गत सहा हजारांवर दूरध्वनी आहेत. तालुक्यातील बहुतांश लोक मुंबई येथे तसेच सैन्यदलात आहेत. मात्र, बीएसएनएल सेवा ग्राहकांना वेळेत मिळत नाही. याकडे येथील अधिकारी व कामगार ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मलकापूर येथे तालुका अंतर्गत एक्स्चेंज आहे. मोबाईल ही सेवा अत्यावश्यक सेवा बनली आहे. प्रत्येक नागरिकाला फोनसेवा, फॅक्स, इंटरनेट, आदी सुविधा गरजेच्या बनल्या आहेत. मात्र बीएसएनएल सेवेमुळे नागरिक, व्यापारी हैराण झाले आहेत. तक्रार करूनदेखील न्याय मिळत नाही. विरळे परिसरात रेंजचा पत्ताच नाही. मात्र, सर्वत्र दूरध्वनी सेवेचे टॉवर दिमाखात उभे आहेत. उदगिरी गावातील नवीन टॉवर गेली पाच वर्षे बंद आहे. गावा-गावांतील नागरिकांनी आपले घरगुती फोन संबंधित कार्यालयाकडे जमा केले आहेत. हे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत.मलकापूर मंडल कार्यालयात गेली तीन महिने कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असताना देखील वरिष्ठ अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत. नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. येथे असणारे कर्मचारीदेखील नागरिकांना नीट उत्तरे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारींचा ओघयेथील उपमंडल अधिकारी यांची बदली कोल्हापूरला झाल्याने हे पद रिक्त आहे, तर इतर कर्मचारी यांच्या बदल्या झाल्याने सर्व पदे रिक्त आहेत. सध्या या कार्यालयाकडे एक अधिकारी, एक लिपिक, शिपाई व एक टेक्निशियन उपलब्ध आहे. अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे या कार्यालयाचा बोजवारा उडाला आहे. ४मलकापूर येथील एका खासगी लाईनमनवर या कार्यालयाचा कारभार सुरू आहे, तर ग्रामीण भागात ही सेवा पूर्णत: बंद आहे. दररोज तालुक्यातून नागरिकांचा तक्रारींचा ओघ सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी जाणूनबुजून येथे बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी पाठवीत नाहीत. हे कार्यालय कोल्हापूर येथे स्थालांतरित करण्याचा अधिकाऱ्यांचा घाट असल्याची चर्चा सुरू आहे.