शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

‘आयआरबी’च्या केबिन्स हटवा :

By admin | Updated: January 1, 2016 00:32 IST

महापौरांची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’मार्फत उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स ह्या वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे अडथळे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. कोल्हापूर शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत आयआरबी कंपनीने शहरातील रस्तेविकासाचे काम केलेले आहे. या कंपनीच्या कामाचा दर्जा तसेच नियोजनाप्रमाणे काम होत नसल्याने शहरात असंतोष निर्माण होऊन शहरवासीयांनी गेली पाच वर्षे आंदोलने केली. शहरवासीयांच्या आंदोलनांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्दची घोषणा केली. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक असले तरी मुख्य व्यापारी पेठेचे केंद्र आहे. दक्षिण काशी व श्री अंबाबाईचे वास्तव्य, दख्खनचा राजा श्री जोतिबा, नृसिंहवाडी ही देवस्थाने तसेच येथे ऐतिहासिक असा पन्हाळा किल्ला आहे. त्यामुळे शहरात भाविक व पर्यटकांची गर्दी असते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक ही शहरातूनच होते. ‘आयआरबी’ कंपनीमार्फत टोलवसुलीसाठी उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेटस्मुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी होत आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत, सुरक्षित व गतीने होण्यासाठी आयआरबी कंपनीने शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर टोलवसुुलीसाठी उभ्या केलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स काढणे आवश्यक आहे. त्याबद्दल तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)टोल रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप अधिसूचना न निघाल्याने शहरवासीयांत संदिग्धता आहे. आयआरबी कंपनी न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याची भीती कोल्हापूर शहरवासीयांच्या मनात जागा करीत आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीने उभारलेल्या केबिन्स हटविणे महत्त्वाचे आहे.- अश्विनी रामाणे, महापौर