शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘आयआरबी’च्या केबिन्स हटवा :

By admin | Updated: January 1, 2016 00:32 IST

महापौरांची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’मार्फत उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स ह्या वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे अडथळे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. कोल्हापूर शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत आयआरबी कंपनीने शहरातील रस्तेविकासाचे काम केलेले आहे. या कंपनीच्या कामाचा दर्जा तसेच नियोजनाप्रमाणे काम होत नसल्याने शहरात असंतोष निर्माण होऊन शहरवासीयांनी गेली पाच वर्षे आंदोलने केली. शहरवासीयांच्या आंदोलनांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्दची घोषणा केली. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक असले तरी मुख्य व्यापारी पेठेचे केंद्र आहे. दक्षिण काशी व श्री अंबाबाईचे वास्तव्य, दख्खनचा राजा श्री जोतिबा, नृसिंहवाडी ही देवस्थाने तसेच येथे ऐतिहासिक असा पन्हाळा किल्ला आहे. त्यामुळे शहरात भाविक व पर्यटकांची गर्दी असते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक ही शहरातूनच होते. ‘आयआरबी’ कंपनीमार्फत टोलवसुलीसाठी उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेटस्मुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी होत आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत, सुरक्षित व गतीने होण्यासाठी आयआरबी कंपनीने शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर टोलवसुुलीसाठी उभ्या केलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स काढणे आवश्यक आहे. त्याबद्दल तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)टोल रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप अधिसूचना न निघाल्याने शहरवासीयांत संदिग्धता आहे. आयआरबी कंपनी न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याची भीती कोल्हापूर शहरवासीयांच्या मनात जागा करीत आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीने उभारलेल्या केबिन्स हटविणे महत्त्वाचे आहे.- अश्विनी रामाणे, महापौर