शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरबी’च्या केबिन्स हटवा :

By admin | Updated: January 1, 2016 00:32 IST

महापौरांची आयुक्तांकडे मागणी

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला तरी टोलवसुलीसाठी ‘आयआरबी’मार्फत उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स ह्या वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे अडथळे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. कोल्हापूर शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत आयआरबी कंपनीने शहरातील रस्तेविकासाचे काम केलेले आहे. या कंपनीच्या कामाचा दर्जा तसेच नियोजनाप्रमाणे काम होत नसल्याने शहरात असंतोष निर्माण होऊन शहरवासीयांनी गेली पाच वर्षे आंदोलने केली. शहरवासीयांच्या आंदोलनांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल रद्दची घोषणा केली. कोल्हापूर शहर हे ऐतिहासिक असले तरी मुख्य व्यापारी पेठेचे केंद्र आहे. दक्षिण काशी व श्री अंबाबाईचे वास्तव्य, दख्खनचा राजा श्री जोतिबा, नृसिंहवाडी ही देवस्थाने तसेच येथे ऐतिहासिक असा पन्हाळा किल्ला आहे. त्यामुळे शहरात भाविक व पर्यटकांची गर्दी असते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील वाहतूक ही शहरातूनच होते. ‘आयआरबी’ कंपनीमार्फत टोलवसुलीसाठी उभारलेल्या केबिन्स, बॅरिकेटस्मुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी होत आहेत. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत, सुरक्षित व गतीने होण्यासाठी आयआरबी कंपनीने शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर टोलवसुुलीसाठी उभ्या केलेल्या केबिन्स, बॅरिकेट्स काढणे आवश्यक आहे. त्याबद्दल तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)टोल रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप अधिसूचना न निघाल्याने शहरवासीयांत संदिग्धता आहे. आयआरबी कंपनी न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याची भीती कोल्हापूर शहरवासीयांच्या मनात जागा करीत आहे. त्यामुळे आयआरबी कंपनीने उभारलेल्या केबिन्स हटविणे महत्त्वाचे आहे.- अश्विनी रामाणे, महापौर