शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोल्हापूरचा टोल नक्कीच घालवू

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

चंद्रकांतदादा पाटील : सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही; दलालांपासून सावधान

कोल्हापूर : शहरांतर्गत वादग्रस्त टोलसंदर्भात मूल्यांकन आल्यावर त्वरित निर्णय घेऊन टोल घालवूच, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. टोलची खरी जबाबदारी कोल्हापूर महापालिकेची असली तरी राज्य सरकार महापालिकेला मदत करील, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणाले, टोलची जबाबदारी महापालिकेची असून ती निभावण्यासाठी शासन या नात्याने योग्य ती मदत आम्ही करू. कराराप्रमाणे कंपनीला भूखंड देण्याबरोबरच उर्वरीत रक्कम कर्जस्वरूपात देण्याची व्यवस्था केली जाईल. टोल बंद करावयाचा झाल्यास संबंधित कंपन्यांना १८ हजार ५०० कोटी द्यावे लागतील. यांपैकी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत ८५०० कोटी, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अंतर्गत दहा हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा समावेश आहे. टोल बंद करण्यासाठी एखादा ‘हेवी इन्कम’ (जास्त वसुली) देणारा टोलनाका १० वर्षे सुरू ठेवून त्या उत्पन्नातून राज्यातील इतर टोलचे पैसे भागविता येतील का? हा विचारही सुरू आहे. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, हे पाहून ‘बीओटी’च्या माध्यमातून अवजड वाहनांची वर्दळ असेल तर कोल्हापूूर-सांगली चौपदरीकरण रस्त्यासाठी टोल लावण्यास हरकत नाही. ते पुढे म्हणाले, संपूर्ण राज्य पारदर्शकपणे चालेल यासाठी प्रयत्नरत आहे. हे सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही. त्यामुळे बाहेर कोणी काम करून देतो असे म्हणून पैसे मागत असेल तर अशा दलालांपासून सावध रहा. बदली करून देतो, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे सांगणारे दलाल कार्यरत आहेत; परंतु योग्य कामासाठी एक रुपयाही लागणार नाही. यासाठीच सरकार सत्तेवर आले आहे. मार्च-एप्रिल महिना म्हणजे बदल्यांचा हंगाम आहे. त्यामुळे असे प्रकार वाढतील. त्यामुळे काळजी म्हणून सरकारच्या वतीने हे सांगितले जात आहे. जे कामासाठी पैसे मागतील, त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)महापालिका बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमहापौरांच्या लाचप्रकरणाने महापालिका बदनाम झाली आहे. त्यामुळे ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे; परंतु महापालिका बरखास्तीसाठी कायदेशीर अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.विभागीय क्रीडासंकुलाचे ५ मार्चला उद्घाटनविभागीय क्रीडासंकुलाचे ७५ टक्के काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन ५ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत गळती लागलेला जलतरण तलाव सोडून इतर काम पूर्ण केले जाईल. तलावाचे काम मेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.