शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा टोल नक्कीच घालवू

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

चंद्रकांतदादा पाटील : सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही; दलालांपासून सावधान

कोल्हापूर : शहरांतर्गत वादग्रस्त टोलसंदर्भात मूल्यांकन आल्यावर त्वरित निर्णय घेऊन टोल घालवूच, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. टोलची खरी जबाबदारी कोल्हापूर महापालिकेची असली तरी राज्य सरकार महापालिकेला मदत करील, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणाले, टोलची जबाबदारी महापालिकेची असून ती निभावण्यासाठी शासन या नात्याने योग्य ती मदत आम्ही करू. कराराप्रमाणे कंपनीला भूखंड देण्याबरोबरच उर्वरीत रक्कम कर्जस्वरूपात देण्याची व्यवस्था केली जाईल. टोल बंद करावयाचा झाल्यास संबंधित कंपन्यांना १८ हजार ५०० कोटी द्यावे लागतील. यांपैकी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत ८५०० कोटी, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अंतर्गत दहा हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा समावेश आहे. टोल बंद करण्यासाठी एखादा ‘हेवी इन्कम’ (जास्त वसुली) देणारा टोलनाका १० वर्षे सुरू ठेवून त्या उत्पन्नातून राज्यातील इतर टोलचे पैसे भागविता येतील का? हा विचारही सुरू आहे. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, हे पाहून ‘बीओटी’च्या माध्यमातून अवजड वाहनांची वर्दळ असेल तर कोल्हापूूर-सांगली चौपदरीकरण रस्त्यासाठी टोल लावण्यास हरकत नाही. ते पुढे म्हणाले, संपूर्ण राज्य पारदर्शकपणे चालेल यासाठी प्रयत्नरत आहे. हे सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही. त्यामुळे बाहेर कोणी काम करून देतो असे म्हणून पैसे मागत असेल तर अशा दलालांपासून सावध रहा. बदली करून देतो, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे सांगणारे दलाल कार्यरत आहेत; परंतु योग्य कामासाठी एक रुपयाही लागणार नाही. यासाठीच सरकार सत्तेवर आले आहे. मार्च-एप्रिल महिना म्हणजे बदल्यांचा हंगाम आहे. त्यामुळे असे प्रकार वाढतील. त्यामुळे काळजी म्हणून सरकारच्या वतीने हे सांगितले जात आहे. जे कामासाठी पैसे मागतील, त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)महापालिका बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमहापौरांच्या लाचप्रकरणाने महापालिका बदनाम झाली आहे. त्यामुळे ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे; परंतु महापालिका बरखास्तीसाठी कायदेशीर अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.विभागीय क्रीडासंकुलाचे ५ मार्चला उद्घाटनविभागीय क्रीडासंकुलाचे ७५ टक्के काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन ५ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत गळती लागलेला जलतरण तलाव सोडून इतर काम पूर्ण केले जाईल. तलावाचे काम मेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.