शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कोल्हापूरचा टोल नक्कीच घालवू

By admin | Updated: February 9, 2015 00:36 IST

चंद्रकांतदादा पाटील : सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही; दलालांपासून सावधान

कोल्हापूर : शहरांतर्गत वादग्रस्त टोलसंदर्भात मूल्यांकन आल्यावर त्वरित निर्णय घेऊन टोल घालवूच, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले. टोलची खरी जबाबदारी कोल्हापूर महापालिकेची असली तरी राज्य सरकार महापालिकेला मदत करील, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणाले, टोलची जबाबदारी महापालिकेची असून ती निभावण्यासाठी शासन या नात्याने योग्य ती मदत आम्ही करू. कराराप्रमाणे कंपनीला भूखंड देण्याबरोबरच उर्वरीत रक्कम कर्जस्वरूपात देण्याची व्यवस्था केली जाईल. टोल बंद करावयाचा झाल्यास संबंधित कंपन्यांना १८ हजार ५०० कोटी द्यावे लागतील. यांपैकी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत ८५०० कोटी, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ अंतर्गत दहा हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचा समावेश आहे. टोल बंद करण्यासाठी एखादा ‘हेवी इन्कम’ (जास्त वसुली) देणारा टोलनाका १० वर्षे सुरू ठेवून त्या उत्पन्नातून राज्यातील इतर टोलचे पैसे भागविता येतील का? हा विचारही सुरू आहे. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, हे पाहून ‘बीओटी’च्या माध्यमातून अवजड वाहनांची वर्दळ असेल तर कोल्हापूूर-सांगली चौपदरीकरण रस्त्यासाठी टोल लावण्यास हरकत नाही. ते पुढे म्हणाले, संपूर्ण राज्य पारदर्शकपणे चालेल यासाठी प्रयत्नरत आहे. हे सरकार कुठल्याही कामाचे पैसे घेत नाही. त्यामुळे बाहेर कोणी काम करून देतो असे म्हणून पैसे मागत असेल तर अशा दलालांपासून सावध रहा. बदली करून देतो, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे सांगणारे दलाल कार्यरत आहेत; परंतु योग्य कामासाठी एक रुपयाही लागणार नाही. यासाठीच सरकार सत्तेवर आले आहे. मार्च-एप्रिल महिना म्हणजे बदल्यांचा हंगाम आहे. त्यामुळे असे प्रकार वाढतील. त्यामुळे काळजी म्हणून सरकारच्या वतीने हे सांगितले जात आहे. जे कामासाठी पैसे मागतील, त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)महापालिका बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमहापौरांच्या लाचप्रकरणाने महापालिका बदनाम झाली आहे. त्यामुळे ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे; परंतु महापालिका बरखास्तीसाठी कायदेशीर अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.विभागीय क्रीडासंकुलाचे ५ मार्चला उद्घाटनविभागीय क्रीडासंकुलाचे ७५ टक्के काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन ५ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत गळती लागलेला जलतरण तलाव सोडून इतर काम पूर्ण केले जाईल. तलावाचे काम मेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.