शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनबद्ध अभ्यासाने निश्चित यश

By admin | Updated: February 26, 2017 00:53 IST

शशिकांत कापसे : ‘लोकमत युवा नेक्स्ट’ व ओम सायन्स अकॅडमीतर्फे ‘अभ्यास तंत्र’ या विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर : करिअरच्या सुरुवातीला येणाऱ्या अपयशामुळे आयुष्यभर पश्चात्ताप करण्यापेक्षा अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास निश्चित यश मिळेल, असा सल्ला प्रा. शशिकांत कापसे यांनी शनिवारी येथे दिला. ‘लोकमत युवा नेक्स्ट’ व ओम सायन्स अकॅडमीतर्फे रविवार पेठ, जैन गल्ली येथील ओम सायन्स अकॅडमी येथे अकरावी सायन्सचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘अभ्यास तंत्र’ या विषयावर दोनदिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. दहावी म्हणजे करिअरचा टर्निंग पॉर्इंट. या परीक्षेत मिळणाऱ्या टक्केवारीवरून विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल ठरते. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी अकरावीला सायन्समधून प्रवेश घेतात आणि पुढे टक्केवारी घसरू लागते. विद्यार्थ्यांच्या करिअरचा आलेख कायम चढता राहावा यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली आहे. ‘लोकमत’तर्फे प्रा. शशिकांत कापसे यांना पुष्पगुच्छ देऊन या कार्यशाळेला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता व सायंकाळी ६ वाजता अशी तीन सत्रे घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती. ‘दहावीनंतर पुढे काय’ असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडतो याचे नेमके उत्तर यावेळी प्रा. कापसे यांनी मार्गदर्शनातून दिले. त्यात परीक्षेतील बदलांची माहिती, पेपर वेळेत कसा सोडवावा, उत्तरपत्रिका कशी लिहावी, कोणते घटक पाठांतर करावेत, लेखनकौशल्य आणि वेळेच्या नियोजनासह तणावमुक्त परीक्षा कशी द्यावी, त्याचबरोबर विज्ञान शाखेत असलेल्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित दिशा कोणती, याबाबतचा कानमंत्रही त्यांनी दिला. प्रा. कापसे म्हणाले, नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये आकलनशक्ती प्रचंड आहे. मात्र, त्यांना योग्य वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचा बहुमोल वेळ वाया जातो. दहावीत मर्यादित अभ्यासक्रमामुळे मुले ९० टक्के मार्क मिळवितात, परंतु अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढल्यानंतर याच विद्यार्थ्यांची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत घसरते. याला नियोजनबद्ध अभ्यासाचा अभाव कारणीभूत ठरतो. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, मात्र त्यापैकी मोजक्याच विद्यार्थ्यांचे ध्येय निश्चित असते. अशा विद्यार्थ्यांमध्ये आपला समावेश होण्यासाठी ९५ टक्केगुण मिळविण्याचे ध्येय निश्चित करण्याची गरज आहे. ध्येय निश्चित केले नाही तर स्वप्न साकार होत नाहीत. त्यामुळे केवळ पासिंग गुणांवर समाधान मानावे लागते. परिणामी, भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊन त्या सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपून जाते. अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, एकाग्रता, लेखन कौशल्य, वेळेचे नियोजन, मास्टर थॉटस, माइंड पॉवर असल्याशिवाय ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचता येणार नाही.