शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

दलबदलू भूमिकाच महाडिक यांना पराभूत करेल:संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:44 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना गृहीत धरून सोयीनुसार पक्षाचा वापर करणारी दलबदलू भूमिकाच धनंजय महाडिक यांना पराभूत करेल. आपण करतो ते ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना गृहीत धरून सोयीनुसार पक्षाचा वापर करणारी दलबदलू भूमिकाच धनंजय महाडिक यांना पराभूत करेल.आपण करतो ते योग्य, ही भूमिकाफार काळ टिकत नाही. त्याला‘ब्रेक’ लागतोच. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱ्यांचे दिवस भरल्याचा इशारा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.यावेळी प्रा. मंडलिक म्हणाले, गेल्या वेळेला निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्याने अडचणी आल्या, तरीही पावणेसहा लाख मते घेतली. गेल्या साडेचार वर्षांत मतदारसंघातील पाचशेंहून अधिक गावांचा दौरा पूर्ण केला. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय व विकासाचा वारसा घेऊन जनतेसमोर जात असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यमान खासदारांनी मतदारसंघात सांगता येईल, असे एकही ठोस काम केलेले नाही. नुसते ‘संसदरत्न’ पुरस्काराचे तुणतुणे वाजवण्यापलीकडे काहीच केले नाही.संसदेत मांडलेल्या प्रश्नांपैकी किती प्रश्न मतदारसंघांतील होते, त्यातील किती प्रश्नांची सोडवणूक केली, याचे उत्तर खासदारांनी द्यावे. संसदेच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार नाही. या ‘संसदरत्न’ पुरस्काराबद्दल वेबसाईटवरून धक्कादायक माहिती पुढे आली. एक एजन्सी प्रश्न विचारणारे, संसदेतील सहभाग याबाबतची माहिती संकलित करते. त्याआधारे हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न विचारणेवगळता इतर निकषांत खासदारांचा शेवटचा क्रमांक आहे, अशा शब्दांत त्यांनी महाडिक यांची खिल्ली उडविली.निष्ठा कशाबरोबर खातात, हे महाडिक कुटुंबीयांना माहिती आहे का? प्रत्येक वेळी ‘सोयीनुसार राजकारण’ करून निष्ठा वाºयावर सोडण्याचे उद्योग केले; पण ज्या-ज्यावेळी कोल्हापूरच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते त्यावेळेला येथील जनतेने राजकीय अभिलेष व पक्षाची चौकट झुगारून देत भल्या-भल्यांना अस्मान दाखविले. हुकूमशाही वृत्तीला ‘ब्रेक’ लागतोच. आता ती वेळ आली असून, महाडिकांचे दिवस भरल्याचा इशारा प्रा. मंडलिक यांनी दिला.राष्टÑवादीत जाण्याचाप्रश्न नव्हतामध्यंतरी आपण राष्टÑवादीत यावे, अशी कागलमधील कार्यकर्त्यांची भावना होती; पण शिवसेना सोडून आपण कधी दुसरा विचारच केला नाही आणि करणारही नाही, असे प्रा. मंडलिक यांनी स्पष्ट केले.बास्केट ब्रीजचे काय झाले?कोल्हापूर शहरासाठी किती निधीदिला? बास्केट ब्रीजचे काय झाले?केवळ ‘गोंडस’ घोषणा करायच्याआणि जनतेची दिशाभूल करण्यात महाडिक कुटुंबीय माहीर आहेत; पण जास्त काळ कोल्हापूरच्या जनतेला फसवता येत नसल्याचे प्रा. मंडलिक यांनी सांगितले.जिल्ह्यास उपाशी,मग निधी कुठे दिला?कागल, करवीरसह मतदारसंघातील सर्वच गावांतून खासदारांनी एक रुपयाही निधी दिला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. मग, त्यांनी निधी दिला कुठे? असा सवाल प्रा. मंडलिक यांनी केला.