शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

सत्तारूढ आघाडीच्या पराभवाची सुरुवात एका अपमानातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील सत्ताधारी आघाडीच्या पराभवाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झालेल्या एका अपमानातून झाली होती. संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संघाचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास नारायण पाटील ऊर्फ आबाजी यांचा त्यांच्या जिव्हारी लागेल असा अपमान केला होता व त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी महाडिक यांची आयुष्यात पुन्हा संगत नको, असा निर्णय घेतला होता. आबाजी सत्तारूढ आघाडीतून बाहेर पडण्यास त्या क्षणापासूनच सुरुवात झाली.

तसे आबाजी हे महाडिक यांचे अत्यंत विश्वासू संचालक, किंबहुना त्यांची सावलीच. कधीच त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात दोन्ही निवडणुकीत ते महाडिक गटाच्या प्रचारात आघाडीवर होते. त्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांचा त्यांच्यावर प्रचंड राग होता. गावातील एका प्रकरणात आबाजींना पोलिसांकडून बराच त्रास झाला. तरीही ते महाडिक यांच्याशी एकनिष्ठ राहिले. परंतु संघाच्या मुंबईतील जागेच्या व्यवहारात महाडिक व पी. एन. पाटील यांच्यात विसंवाद घडला. त्यातून महाडिक यांनी आबाजींना राजीनामा देण्याचे आदेश दिले. तेवढेच करून ते थांबले नाहीत. संघाच्या राजकारणातील अध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ संचालकास त्यांनी त्यांच्या स्वाभिमानास ठेच पोहोचेल अशी वागणूक दिली. त्यानंतर आबाजींनी लगेच राजीनामा दिला. परंतु ते महाडिक यांच्यापासून दूर गेले. ते संघात महाडिक यांनी बोलविलेल्या बैठकीस जात नसत. पुढे लोकसभा निवडणुकीतही ते धनंजय महाडिक यांच्या प्रचारापासून लांब राहिले. त्यातच गत विधानसभेला महाडिक यांनी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्याबद्दलही टिपणी केली. त्यातून तेही दुखावले. या दोघांची गट्टी जमली. संघाच्या राजकारणात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या निधनानंतर चुयेकर घराणे आबाजींच्या चांगले संपर्कात होते. त्यामुळे आबाजी असतील तिकडे चुयेकर घराणे राहणार, हे स्पष्टच होते. त्यामुळेच आबाजी-डोंगळे-चुयेकर ही त्रिमूर्ती एकत्र आली व तिथूनच सत्ताधारी आघाडीची पडझड सुरू झाली.

डोंगळे-आबाजी यांनी नेत्यांकडून सगळे फायदे घेऊन बाहेर पडले असल्याने त्यांच्यामागे कोण जातंय, असा एक होरा होता. परंतु तो खोटा ठरला. या तिघांनी आपल्याकडील ठरावधारक एकही हलू दिला नाहीच, शिवाय सत्तारूढ आघाडीतील मतेही कशी मिळतील अशी फिल्डिंग लावल्याने विरोधी आघाडीचा विजय सोपा बनल्याचे चित्र निकालानंतर दिसत आहे.