शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अभियांत्रिकी प्रवेशाच्या संधी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:01 IST

संतोष मिठारी । कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर ...

ठळक मुद्देपदविकाधारकांचा कोटा घटविल्याचा परिणाम : निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक

संतोष मिठारी ।कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रवेशाचा कोटा १० टक्क्यांवर आणण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या प्रवेशाच्या संधी कमी होणार आहेत. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी तंत्रनिकेतनमधील शिक्षक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी जागा रिक्त असल्याच्या कारणावरून ‘एआयसीटीई’ने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाकरिता सध्या असणारा २० टक्के जागांचा कोटा आता १० टक्क्यांवर आणला आहे. एका अभियंत्याबरोबर (इंजिनिअर) सात पदविकाधारक आणि त्यांच्यानंतर १९ कामगार असे साधारणत: प्रमाण आहे. मात्र, सध्या हे प्रमाण बिघडले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पदविकाधारकांचे प्रमाण कमी आहे. पदविका अभ्यासक्रमानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित होतात. तीन वर्षांची पदविका पूर्ण केल्यानंतर पदवीसाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळत असल्याने, पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सोईस्कर व्हावे, या उद्देशाने दहावीनंतर विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीसाठी प्रवेशित होताना प्रवेश परीक्षा द्यावी लागत नसल्याने अनेक विद्यार्थी दहावीनंतरचा पदविका करण्यास प्राधान्य देतात.आधी निर्णय व्हावापदविका अभ्यासक्रमांचे ९० टक्के विद्यार्थी पदवीसाठी प्रवेशित होतात. त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तीन वर्षे आधी निर्णय जाहीर करणे आवश्यक होते.

आकडेवारी दृष्टिक्षेपातमहाराष्ट्रातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या : ४५०प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारेविद्यार्थी : सुमारे दीड लाखशिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी : सुमारे साडेचार लाखकोल्हापुरातील तंत्रनिकेतनचीसंख्या : २३विद्यार्थ्यांची संख्या : १४,०००

 

पदविका प्रवेशाच्या जागा घटविण्याच्या निर्णयामुळे पदवी प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाच्या संधी कमी होणार आहेत.- डॉ. महादेव नरके, प्राचार्य,डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक.

दहावीनंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शासन आणि व्यावसायिक संस्थांद्वारे राबविण्यात येत असलेली मोहीम पाहता, ‘एआयसीटीई’चा सदरचा निर्णय विद्यार्थी, पदविका संस्थाचालकांच्या दृष्टीने निराशाजनक आहे.- दिग्विजय पवार, प्राचार्य,वाय. डी. माने इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, कागल.

आकडेवारी दृष्टिक्षेपातमहाराष्ट्रातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या : ४५०प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणारेविद्यार्थी : सुमारे दीड लाखशिक्षण घेणारे एकूण विद्यार्थी : सुमारे साडेचार लाखकोल्हापुरातील तंत्रनिकेतनचीसंख्या : २३विद्यार्थ्यांची संख्या : १४,०००