शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौदा दिवसांनंतर मृत्यू झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गेल्या १४ दिवसांतील मृतांचा आकडा मंगळवारी पहिल्यांदा कमी आला. संध्याकाळी ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गेल्या १४ दिवसांतील मृतांचा आकडा मंगळवारी पहिल्यांदा कमी आला. संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघे इतर जिल्ह्यातील आहेत. ९६१ जणांनी कोरोनावर मात केली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ८६२ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊनची सुरुवात झाली असून येत्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घटेल असा विश्वास प्रशासनाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील कोरोना मृतांचा आकडा भीतीदायक होता. या पार्श्वभूमीवर १४ दिवसांनंतर मृतांचा आकडा ३५ वर आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक ३२५ कोरोनाचे रुग्ण कोल्हापूर शहरामध्ये नोंदवण्यात आले असून करवीर तालुक्यात १९१, हातकणंगले तालुक्यात १७४ तर राधानगरी तालुक्यात १०५ रुग्ण आढळले आहेत. राधानगरी तालुक्यातील रुग्णवाढ कशामुळे झाली याचा शोध घेण्याची गरज आहे. इचलकरंजीमध्ये १०९ तर अन्य जिल्ह्यातील ७६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

चौकट

सर्वाधिक मृत्यू हातकणंगलेत

हातकणंगले ०६

नागोबावाडी वडगाव, हातकणंगले, माळवाडी माणगाव, पुलाची शिरोली, खोची, पेठ वडगाव.

इचलकरंजी ०५

जाधव मळा, सांगली नाका, उत्तम प्रकाश टॉकीज, लालनगर, गणेशनगर.

कोल्हापूर ०५

न्यू वाशीनगर, जागृतीनगर, आर. के. नगर ०३

आजरा ०३

किणे, बहिरेवाडी, लाकूडवाडी.

करवीर ०३

म्हारूळ, नागदेववाडी, सांगरूळ

भुदरगड ०२

वाघापूर, गारगोटी

चंदगड ०२

चंदगड, बेलेभाट

शिरोळ ०२

जयसिंगपूर, यड्राव

पन्हाळा ०२

पैजारवाडी, कळे

राधानगरी ०१

कासारवाडा

शाहूवाडी ०१

उदगिरी

इतर ०३

झुंजारवाडी अथणी, मालगाव मिरज, मंगसुळी अथणी