शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऊस क्षेत्रात होणार घट

By admin | Updated: December 14, 2015 00:07 IST

आजरा तालुका : पर्यायी पिकांना प्राधान्य

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाण्याअभावी ऊस पिकाच्या वजनामध्ये झालेली घट, वन्य प्राण्यांकडून होणारे पिकांचे नुकसान, उपसाबंदीचे संकट व पर्यायी भात पिकास मिळणारे घसघशीत दर यामुळे आजरा तालुक्यात ऊस क्षेत्रात यावर्षी घट होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे.आजरा तालुक्यातून सुमारे पावणेदोन लाख टन ऊस उत्पादित होतो. त्यातील सरासरी ६० हजार टन ऊस प्रतिवर्षी बाहेरच्या साखर कारखान्यांना जातो. हा धोका स्थानिक आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ओळखून बाहेरच्या तालुक्यातील उसाला गाळपासाठी गेले चार वर्षे प्राधान्य दिले आहे. या प्रकारामुळे स्थानिक ऊस उचल करण्याचे नियोजन कोलमडते. परिणामी, तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.वर्षभर कष्ट करून पदरात काही पडेल याची खात्री उसाबाबत नाही, तर चार महिन्यांत भात पीक घेऊन घसघशीत उत्पन्न मिळण्याची हमी, असे चित्र असल्याने तालुक्यात यापुढे ऊस उत्पादन घटणार हे स्पष्ट आहे.एकीकडे ऊस उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची होत असलेली दमछाक, दरासाठी करावा लागणारा संघर्ष असे चित्र असताना दुसरीकडे भात पिकास मिळणारा घसघशीत दर, दारापर्यंत येऊन उचलीसाठी व्यापाऱ्यांकडूनच केली जाणारी धडपड, असा विरोधाभास दिसत आहे. हा विरोधाभासही उसाचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरू लागला आहे.तांदूळ विक्री केंद्रांत वाढऊस उत्पादकांसमोर ऊस उचल करण्यासाठी ऊसतोड टोळ्यांकडे करावी लागणारी विनवणी, शेती सेंटर आॅफिसला मारावे लागणारे खेटे, शेवटच्या टप्प्यात ऊसतोड टोळ्यांना द्यावी लागणारी भरमसाठ स्वरूपातील खुशाली, अशा सर्व प्रकारांना सामोरे जाण्याचे धाडसही हळूहळू कमी होऊ लागले आहे. एकीकडे ऊस उत्पादकांची अवस्था अशी असताना दुसरीकडे भात पिकाला मात्र चांगले दिवस येऊ लागले आहेत. घनसाळसारख्या भाताला विक्रमी ३५०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळू लागला आहे. दिवसेंदिवस पर्यटकांच्या वाढत्या मागणीमुळे ठिकठिकाणी तांदूळ विक्री केंद्रे उघडली जात आहेत. भात उत्पादकांच्या बांधावर जाऊन व्यापारी वर्ग भात खरेदी करू लागला आहे.जंगलामध्ये पाण्याचे संपत आलेले साठे आणि चाऱ्याची निर्माण झालेली टंचाई यामुळे वन्य प्राण्यांनी शेतातील पिके आपले लक्ष्य बनविले आहे. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हतबल होऊन पिकांचे होणारे नुकसान बघत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून वन्य प्राण्यांचा त्रास होतो.पाणीटंचाईचे संकट : पिकासाठी पाणी कोठून आणणार?यावर्षी तर तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आहे. महसूलकडून पाणी उपसाबंदीचे हत्यार उपसले जात आहे. पाण्याचे साठे कोरडे पडू लागले आहेत. अशावेळी पिकासाठी पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आतापासून शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. पाणीच नसेल, तर ऊस कसा घ्यायचा? हा प्रश्नही बोलका आहे.