शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘पर्यटन जिल्हा’ घोषित करा

By admin | Updated: September 17, 2015 23:44 IST

पर्यटन अभ्यासगटाचा सूर : प्रादेशिक विकास आराखडा बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीसह विविधतेने नटलेला आहे. येथील वातावरण पर्यटनास पूरक असल्याने तो ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करावा, असा सूर पर्यटन व पर्यावरण अभ्यासगटाच्या सदस्यांतून बुधवारी (दि. १६) उमटला.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. नगररचना विभागाचे सहसंचालक एम. आर. खान, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, बांधकाम व्यावसायिक राजीव परीख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.शाहूवाडी तालुक्यातील बर्की हे गाव पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. मात्र, याच गावाला सहा ते आठ महिने पर्यटक कसे येतील, याचाही विचार केला जाईल, असे पर्यटन अभ्यास गटातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यातील पाणी, गड-किल्ले, नैसर्गिक साधनसंपत्ती व हिरवाईमुळे कोल्हापूर हा पर्यटनासाठी पोषक असा जिल्हा आहे. पर्यटनासोबत कृषी पर्यटनालाही चालना दिली पाहिजे. या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक लोकांनाही चांगला रोजगार मिळण्याचे साधन मिळू शकते. बर्की गावात केवळ पावसाळ्यातच पर्यटक येतात. त्या ठिकाणी शून्य बजेटमध्ये सहा ते आठ महिने पर्यटक कसे येतील, याबाबत नियोजन केले जाईल. जिल्ह्यात बर्कीसारखी शेकडो गावे आहेत. त्यांचाही विकास झाला पाहिजे, असे पर्यटन अभ्यासगटाच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सर्वसामान्य आणि स्थानिक माणसाला ज्या पर्यटनाचा फायदा होईल, असा प्रस्ताव तयार करावा. कोल्हापुरातील अनेकजण नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा इतरत्र धाव घेतात. त्यांना नोकरीचा चांगला पर्याय त्यांच्याच गावात मिळेल, असे नियोजन केले पाहिजे; तरच पर्यटन विकास आराखड्याचा हेतू साध्य होणार आहे. त्याचबरोबर पर्यटन काही कालावधीपुरतेच न चालता ते जास्तीत जास्त दिवस कसे चालेल, या दृष्टीनेही विचार व्हावा. दोनवेळचे जेवण, प्राथमिक शिक्षणासह सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, अशा योजना जरूर राबविल्या पाहिजेत. मात्र, कोणत्याही योजनेमध्ये स्थानिक लोकांचा यात सहभाग नसेल तर ते अडचणीचे ठरू शकते.परीख म्हणाले, हद्दवाढीमुळे विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ४२ गावांचा समावेश असलेला प्रस्ताव पाठवावा; कारण सध्या केलेल्या २० गावांच्या प्रस्तावांमुळे शहरासाठी अपेक्षित असणारी लोकसंख्या होणार नाही.