शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : हसन मुश्रीफ

By admin | Updated: September 21, 2015 00:31 IST

तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती पाहून शासनाने दुष्काळ जाहीर करावा. १ आॅक्टोबर रोजी बांधकाम मजूर घरेलू कामगार योजनांचे गरीब लाभार्थी यांचा मोर्चा कोल्हापूरमध्ये काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पाहून शासनाला धडकी भरेल, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. या मोर्चात ३५ ते ४० हजार लोक सहभागी होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे होते. या बैठकीत शेतकरी संघात बिनविरोध निवड झाल्याबद्दल युवराज पाटील, तालुका संघाचे नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती विजयादेवी राणे, दिलीप पाटील, प्रवीणसिंह पाटील, भैया माने, देवानंद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले की, शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी. यासाठीच प्रयत्न केले. तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. स्वागत दूरसंचार निगमचे सदस्य संजय हेगडे यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक कागलच्या सहभागाशिवाय होत नाही. हे आमदार मुश्रीफांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचेच यश आहे. शेतकरी संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले आणि त्यांनी शेतकरी संघाची निवडणूकबिनविरोध व्हावी याची जबाबदारी मुश्रीफांवर सोपवली आहे. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, कागल तालुक्यात सध्या समझोत्याचे राजकारण सुरू आहे. ही चांगली बाब आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण करणाऱ्यांना थारा नको. आभार तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी मानले. (प्रतिनिधी)