शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’चा निर्णय खुल्या प्रवर्गासाठी अन्यायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:20 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निर्णय खुल्या प्रवर्गासाठी अन्यायकारक आहे. करिअरबाबत भेदभाव नको. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी ...

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) निर्णय खुल्या प्रवर्गासाठी अन्यायकारक आहे. करिअरबाबत भेदभाव नको. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांपासून दूर जातील, अशा भावना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी व्यक्त केल्या. ‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहावेळा परीक्षा देता येणार आहे. याबाबत ‘लोकमत’ने विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

प्रतिक्रिया

या निर्णयाने ‘एमपीएससी’ने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देण्याच्या प्रयत्नांवर घाला घातला आहे. हा निर्णय आम्हा विद्यार्थ्यांना अमान्य आहे. राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

- प्रतीकसिंह काटकर, अध्यक्ष, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची मर्यादा निश्चित करणे हे विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. या परीक्षांमध्ये यश मिळवून करिअर घडविण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणारा हा निर्णय राज्य शासनाने रद्द करावा.

- पवन पवार, मोरेवाडी

या निर्णयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत भेदभाव करण्यात येऊ नये. कमाल संधीच्या मर्यादेची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांमधील लढाऊ आणि देश बदलविण्याची वृती नाहीशी होईल. विद्यार्थी हिताचा विचार सर्वांनी करावा.

- अनुराधा सटाले, कोल्हापूर

‘एमपीएससी’ने घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या दोन-तीन संधी गेल्यास त्यांच्यावर मानसिक दबाव येईल. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांपासून दूर जातील. हा निर्णय लवकर मागे घेतला नाही, तर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

- ऋतुराज माने, राजारामपुरी

चौकट

‘एमपीएससी’ने वेळापत्रकाचे पालन करावे

सध्या राज्यात शासकीय नोकरीच्या संधींची मुळात कमतरता आहेत. त्यातच अशा पद्धतीने संधी मर्यादित करणे ही जर निवडीच्या प्रक्रियेतील सुधारात्मक उपाययोजना असेल, तर उपलब्ध संधींचा पर्याप्त आणि यथायोग्य कार्यक्षम वापर करता येणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने परीक्षांचे वेळापत्रक, भरती केल्या जाणाऱ्या पदांची संख्या ही वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करणे, परीक्षा वेळेवर घेणे, निकाल वेळेवर लावणे, आदींचे पालन करणे गरजेचे असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी सांगितले.

फोटो (३११२२०२०-कोल-प्रतिकसिंह काटकर (विद्यार्थी), पवन पवार (विद्यार्थी), अनुराधा सटाले (विद्यार्थी), ऋतुराज माने (विद्यार्थी)