शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा निर्णय

By admin | Updated: December 11, 2015 00:51 IST

टोलचा प्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन; टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहेच; तर आता त्याबाबतचा अध्यादेश कधी काढणार, याची विचारणा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन संपताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय गुरुवारी येथे झालेल्या कोल्हापूर शहर, जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचाही निर्णय यावेळी झाला. भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. १ डिसेंबरपूर्वी हा टोल रद्द करून तसा अध्यादेश काढला जाईल, असे आधी सांगण्यात आले; परंतु ही मुदत पुन्हा एक महिन्याने वाढविली. सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, त्या अधिवेशनात तशी घोषणा करावी आणि अध्यादेश काढावा, अशी आठवण करून देण्यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे १६ डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. विधिमंडळ अधिवेशनात कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचे पडसाद त्यामध्ये उमटावेत, सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून पुन्हा एकदा आंदोलन हाती घ्यावे, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. यावेळी काहींनी पुन्हा एकदा ‘कोल्हापूर बंद’ करावे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूर प्रवेश बंद करावा, अशा संतप्त सूचना मांडल्या; परंतु एकदम टोकाची भूमिका न घेता संयमाने आंदोलन करू, असे ठरले. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम १६ डिसेंबर रोजी धरणे धरण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशन संपताच पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चाची तारीख १६ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)प्रकल्पाची किंमत वस्तुस्थितीवर ठरवारस्तेविकासाची किंमत ही भाजी मंडईतील मालासारखी घासाघीस करून न ठरविता तत्त्वावर तसेच वस्तुस्थितीवर निश्चित करावी, असे सांगतानाच ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यावेळी म्हणाले की, टोलमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले आहे; त्यामुळे आकडेवारीशी तसेच रकमेशी कृती समितीचा संबंध नाही. ३१ डिसेंबरपूर्वीची मुदत कशी पाळणार, हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. या बैठकीत कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप देसाई, अ‍ॅड. बाबा इंदूलकर, लालासाहेब गायकवाड, आदींची भाषणे झाली. जयकुमार शिंदे यांनी आभार मानले. बैठकीस दिलीप पवार, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अशोकराव साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.